
अविश्वसनीय! लाटांशी झुंज देत जोडप्याने श्रीलंकेहून भारतापर्यंत पोहत केला प्रवास, सोशल मीडियावर रंगली चर्चा; पाहा Viral Video
जोडप्याने पोहत श्रीलंकेहून भारतात घेतली एंट्री
दोन्हीही जोडपे बंगळूरमधील रहिवाशी असून पतीचं नाव दानिश अब्दी तर पत्नीच नाव वृषाली प्रसाद असं आहे. दोघांनी श्रीलंकेपासून भारतापर्यंत सुमारे ३२ किलोमीटरचे अंतर पाण्यात पोहून पार केले. समुद्रातून हे अंतर पूर्ण करण्यासाठी त्यांना अंदाजे १० तास ४५ मिनिटांचा अवधी लागला. त्यांनी सकाळी ४.३० वाजता पोहायला सुरुवात केली. माहितीनुसार, जोडप्याने श्रीलंकेतील तलाईमन्नारपासून राम सेतूमार्गे भारतातील धनुष्कोडीपर्यंत पोहत प्रवास केला. हा प्रवास त्यांच्यासाठी अजिबात सोपा नव्हता. जोरदार लाटा, बदलणारा सागरी प्रवास आणि सतत पोहत असल्यामुळे होणारा थकवा या सर्व अडचणींवर मात करुन त्यांनी आपला प्रकल्प पूर्ण करुन दाखवला. तथापि, त्यांच्या या प्रवासात त्यांना मदत करण्यासाठी पॅरामेडिक्स आणि तटरक्षक दलाचा समावेश असलेले एक सहाय्यक पथक तिथे उपस्थित होते. या पथकाने त्यांच्या या प्रवासादरम्यान त्यांच्या सुरक्षेवर लक्ष ठेवले.
पत्नीचा शिरच्छेद करु पाहणाऱ्या पतीला लोकांनी भरस्त्यात दिला चोप, बंगळूरुतील घटनेचा Video Viral
जोडप्याच्या या धाडसी प्रकल्पाने सोशल मिडियावर सर्वांना थक्क केलं असून यूजर्स त्यांच्या अनोख्या संकल्पनेचे काैतुक करत आहेत. हा व्हिडिओ @our.life.in.miles नावाच्या जोडप्याच्या अधिकृत अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “खूप खूप अभिनंदन! जय बजरंग बली! भारताच्या या ‘पॉवर कपल’ला (शक्तीशाली जोडीला) मानाचा मुजरा!”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तुमचा अभिमान वाटतो तू एकदम जोशात आहेस; हे असेच चालू ठेवा, तूम्ही खूपच छान कामगिरी केली” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “म्ही दोघेही खरोखरच अविश्वसनीय आहात. या संपूर्ण प्रवासात तुम्ही एकमेकांच्या सोबतीने राहिलात, ही बाब अत्यंत प्रेरणादायी आहे. तुम्ही दोघेही एकत्रितपणे असेच यश संपादन करत राहो, अशी मी प्रार्थना करतो”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.