
Europe Anti Migrant Protests Impact On Indians
ब्रिटन, आयर्लंड, जर्मनी आणि नेदरलँड्ससारख्या देशांमध्ये स्थलांतराच्या मुद्द्यावरुन राजकीय आणि सामाजिक तणाव वाढत आहे. अनेक ठिकाणी हिंसक निदर्शने सुरु असून सरकारकडून व्हिसा नियम कडक केले जात आहे. उत्तर आयर्लंडची राजाधानी बेलाफेस्टमध्ये सुरु असलेल्या हिंसक निदर्शनांमुळे परिस्थिती अधिक तणावपूर्ण बनली आहे. याचे अनेक थरारक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यांवर उतरले असून स्थलांतरितांच्या घरांवर, दुकानांवर आणि वाहनांवर हल्ले केले जात आहेत. स्थलांतर लोकांविरोधात तीव्र घोषणाबाजी केली जात असून सरकारच्या धोरणांविरोधातही तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. डब्लिन, लंडन आणि ग्लासगोससारख्या शहरांमध्येही वातावरण तापले आहे. वाढती महागाई, घराची टंचाई, रोजगाराच्या कमी संधी, सार्वजनिक सुविधांवर ताण यासाठी स्थलांतरितांना जबाबदार धरले जात आहे. युरोपीय देशांमध्ये निर्वासितांची संख्या वाढत असून हा मुद्दा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
या हिंसाचासाराचा परिणाम भारतीयांवरही होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. युरोमध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय विद्यार्थी, डॉक्टर, आयटी इंजिनियर्स आणि व्यावसायिक कार्य करत आहे. मात्र, वाढत्या विरोधामुळे भविष्यात विद्यार्थी व्हिसा, वर्क परमिट आणि स्थायी नागरिकत्वावर युरोपीय देशांच्या सरकारकडून अधिक कठोर नियम लागू होण्याची शक्यता आहे.
युरोपमध्ये कुश मनुष्यबळाची गरज अजूनही आहे. परंतु वाढता हिंसाचार लक्षात घेता भारतीयांसाठी ही संधी पूर्णपणे बंद होऊ शकते. यामुळे युरोपमध्ये जाऊन शिकण्याचे, तेथे नोकरी करण्याचे किंवा स्थायिक होण्याचे स्वप्नाला ब्रेक लागू शकतो.
🚨Belfast protests turned violent yesterday, causing much damage as people let their anger out on migrant homes, cars and shops. pic.twitter.com/OUy3ndZLkx — Make Europe Great Again – M.E.G.A (@ScaryEurope) June 12, 2026
India Europe Tensions : भारताला घेरण्याचा प्रयत्न उलटला; जयशंकर यांनी युरोपलाच सुनावलं, प्रकरण काय?