भारतापुढे झुकली चिनी आर्मी; डेपसांगमधून 3 लष्करी चौक्या हटवल्या, 20 किमी हटले मागे, पहा सॅटेलाईट फोटो ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
बीजिंग : पूर्व लडाखमध्ये भारतीय लष्कराच्या 50 हजार जवानांच्या निर्धाराचे आता फळ येत आहे. 2020 मधील गलवान हिंसाचारापासून, भारतीय लष्कराचे हे शूर सैनिक कडाक्याच्या थंडीतही चीनच्या डोळ्यासमोर उभे आहेत. भारतीय लष्कराच्या या धाडसाचे परिणाम यायला लागले असून चीनला डेपसांग सेक्टरमधील आपले सैन्य मागे घ्यावे लागले आहे. ताज्या सॅटेलाइट इमेजेसवरून असे समोर आले आहे की, भारत आणि चीन यांच्यातील करारानंतर चिनी सैन्याने डेपसांग सेक्टरच्या वाय जंक्शनमधील त्यांच्या 3 चौक्या उद्ध्वस्त केल्या आहेत.
चिनी सैन्याने सुमारे 20 किमी माघार घेतली आहे. त्यामुळे भारतीय जवानांनी आता या भागात सहज गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. चीनने आता दुसऱ्या ठिकाणी या लष्करी चौक्या स्थापन केल्या आहेत. चिनी सैन्याने पूर्व लडाखमधील एलएसीवरील डेपसांग भागात २० किमी मागे माघार घेतली असून आपल्या ३ लष्करी चौक्या मागे घेतल्या आहेत. ताज्या सॅटेलाइट फोटोंमध्ये याची पुष्टी झाली आहे. याआधी भारत आणि चीनच्या लष्करामध्ये करार झाला होता. भारतीय लष्कराचा संयम आता सुटला आहे.
यापूर्वी चीनने भारतीय सैनिकांना या भागात गस्त घालण्यापासून रोखले होते आणि लष्करी संरचना मजबूत केली होती. चीनने बांधलेल्या नव्या लष्करी चौक्या वादग्रस्त भागापासून दूर आहेत. एवढेच नाही तर पीएलएच्या या लष्करी पोस्ट अल्पकालीन स्वरूपाच्या आहेत. चिनी सैन्य आपल्या पूर्वीच्या स्थितीपासून सुमारे 20 किमी मागे गेले आहे. नवीनतम उपग्रह फोटो ऑक्टोबर महिन्यात घेण्यात आले आहेत. या चित्रांवरून चीनने आपले सैन्य मागे घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी 21 ऑक्टोबर रोजी भारत आणि चीन यांच्यात डेमचोक आणि डेपसांगच्या मैदानी भागात गस्त घालण्यासाठी करार करण्यात आला होता जेणेकरून एलएसीवरील तणाव कमी करता येईल.
जागतिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : एकटे पडले युनूस ! बांगलादेशात हिंदूंच्या विरोधात जे काही चालले आहे यावर अमेरिकेची करडी नजर
भारत आणि चीनमधील संबंध सामान्य होत आहेत
या करारानंतर डेपसांगमध्ये गस्त सुरू झाली आहे. हे क्षेत्र अधिक आव्हानात्मक मानले जात होते. ताज्या करारानुसार, दोन्ही सैन्यांमधील गस्त आता एप्रिल 2020 पूर्वीच्या परिस्थितीनुसार असावी. धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या या भागातील परिस्थिती सामान्य होण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे यावरून दिसून येते. भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वीच पेट्रोल पॉईंट 10 ते 13 ला भेट दिली आहे आणि चिनी सैन्याच्या माघारीची वैयक्तिकरित्या पडताळणी केली आहे.
जागतिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : एक मिसाइल सोडण्यासाठी मोजावी लागते ‘एवढी’ किंमत; जाणून घ्या
ही गस्त सुरू झाल्यानंतर आता मेंढपाळांनाही मेंढ्या चरण्याची परवानगी मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. वाय जंक्शनवर गस्त घालण्याचे अधिकार मिळेपर्यंत कोणताही करार होणार नाही, असे भारताने म्हटले होते. हा भाग अनेक दिवसांपासून भारत आणि चीन यांच्यातील वादाचा विषय होता. आता चीनने नमते घेतल्यानंतर भारतीय लष्कराने गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. दिवाळीच्या दिवशी भारतीय आणि चिनी सैन्याने एकमेकांना मिठाई वाटली. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही या कराराला दुजोरा दिला आहे.