
india eu summit 2026 republic day chief guest 3 historic deals fta security mobility
India EU Summit 2026 New Delhi : भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जागतिक राजकारणातून एक अत्यंत सकारात्मक बातमी समोर आली आहे. युरोपियन युनियनच्या (EU) परराष्ट्र धोरण प्रमुख कोया कॅलास (Kaja Kallas) यांनी युरोपियन संसदेत बोलताना भारताचे वर्णन युरोपसाठी “अपरिहार्य” (Indispensable) असे केले आहे. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे मुख्य पाहुणे म्हणून येण्यापूर्वी ईयू नेत्यांनी भारतासोबतच्या तीन महाकरारांना हिरवा कंदील दिला आहे, ज्यामुळे येणारा काळ भारताच्या आर्थिक आणि सामरिक प्रगतीसाठी सुवर्णकाळ ठरणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार करार आता निकालात निघण्याच्या मार्गावर आहे. वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी याला “मदर ऑफ ऑल डील्स” असे संबोधले आहे. या करारामुळे भारतीय कापड, चामड्याच्या वस्तू आणि कृषी उत्पादनांना युरोपची मोठी बाजारपेठ खुली होईल. तर दुसरीकडे, युरोपमधील स्वस्त तंत्रज्ञान, रसायने आणि यंत्रसामग्री भारताला मिळणार आहे. २०२६ च्या अखेरीस या करारामुळे दोन्ही देशांमधील व्यापार वर्षाला ३०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडेल असा अंदाज आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India-US Trade Deal: ‘मोदींवर माझा मोठा विश्वास!’ 50% टॅरिफच्या वादात ट्रम्प यांची भारतावर स्तुतीसुमनं; काय आहे नवी चाल?
युरोपियन युनियन आणि भारत आता केवळ व्यापारी मित्र न राहता ‘सामरिक भागीदार’ बनणार आहेत. कोया कॅलास यांनी स्पष्ट केले की, दोन्ही देश एका नवीन सुरक्षा आणि संरक्षण भागीदारीवर स्वाक्षरी करणार आहेत. यामध्ये सागरी सुरक्षा (Indo-Pacific), सायबर सुरक्षा आणि दहशतवादविरोधी कारवायांचा समावेश असेल. तसेच, दोन्ही देशांमध्ये गोपनीय माहितीची देवाणघेवाण सुलभ करण्यासाठी ‘सुरक्षा माहिती करार’ (SOIA) देखील केला जाणार आहे. चीनच्या वाढत्या विस्तारवादाला रोखण्यासाठी ही भागीदारी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
#BREAKING: EU High Representative for Foreign Affairs and Security Policy, Kaja Kallas inside EU Parliament announces that #India is becoming “indispensable” for Europe’s economic resilience. New EU-India Security and Defence Partnership to be inked next week. FTA on cards. pic.twitter.com/32raexQLKZ — Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) January 21, 2026
credit – social media and Twitter
तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा करार म्हणजे ‘कम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी अँड रिसर्च फ्रेमवर्क’. या करारामुळे भारतीय विद्यार्थी, संशोधक, कुशल व्यावसायिक आणि हंगामी कामगारांना युरोपमध्ये जाणे आणि तिथे काम करणे अत्यंत सोपे होणार आहे. व्हिसा प्रक्रियेतील सुलभता आणि पदव्यांची परस्परांना मान्यता यामुळे भारतातील टॅलेंटला युरोपच्या बाजारपेठेत मोठी संधी मिळेल. जर्मनी, फ्रान्स आणि इटली यांसारख्या देशांनी यापूर्वीच अशा करारांना पाठिंबा दिला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Davos : ‘तुम्ही टेबलावर नसाल तर मेनूवर असाल!’ Canada-America व्यापार युद्ध पेटले; मार्क कार्नी यांनी दिला धोक्याचा इशारा
युरोप सध्या रशिया-युक्रेन युद्ध आणि अमेरिकेच्या बदलत्या व्यापारी धोरणांमुळे (Trump Tariffs) तणावाखाली आहे. अशा स्थितीत भारतासारखा मोठा लोकशाही देश आणि वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था युरोपसाठी एक सुरक्षित आणि विश्वासार्ह भागीदार बनला आहे. २७ जानेवारी रोजी होणाऱ्या १६ व्या भारत-ईयू शिखर परिषदेत ‘स्ट्रॅटेजिक अजेंडा २०३०’ चा रोडमॅप जाहीर केला जाईल, जो पुढील दशकभरासाठी भारताला युरोपचा सर्वात जवळचा मित्र म्हणून प्रस्थापित करेल.
Ans: युरोपियन युनियनचे अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयन आणि युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा हे प्रमुख पाहुणे आहेत.
Ans: यामुळे भारतीय विद्यार्थी, डॉक्टर, इंजिनीअर्स आणि कुशल कामगारांना युरोपीय देशांत नोकरी आणि शिक्षणासाठी व्हिसा मिळवणे सहज शक्य होईल.
Ans: या करारामुळे दोन्ही देशांमधील सीमा शुल्क कमी होईल, ज्यामुळे व्यापार ५०% ने वाढेल आणि ग्राहकांना स्वस्त तंत्रज्ञान व उत्पादने मिळतील.