
India Nepal Relations (
नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल यांनी बुधवारी (१० जून) नेपाळच्या ससंदेत याबाबत स्पष्टीकरण दिले. त्यांनी सांगितले की, दोन्ही देशांमधील सीमा वाद द्विपक्षीय विषय आहे. यामुळे ऐतहासिक करार, जुने नकाशे आणि परस्पर सामंजस्यातून वाद सोडवण्यात येईल. यासाठी नेपाळ वचनबद्ध असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच त्यांनी दोन्ही देशांमध्ये लांबलेल्या चर्चेला पुन्हा गती मिळाली असल्याचे स्पष्ट केले.
भारत-नेपाळ सामी कार्य गटासह इतर क्षेत्रात दोन्ही देशांनी पुन्हा संबंध प्रस्थापित करण्यास सुरुवात केली आहे. रखडलेल्या अनेक मुद्द्यांवर नव्या चर्चा सुरु करण्यात आली असून वाद मिटण्याच्या दिशेने हे एक सकारात्म पाऊल असल्याचे खनल यांनी म्हटले.
गेल्या आठड्यात खनल यांनी भारताला भेट दिली होती. यावेळी त्यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली. यावेळी नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी नेपाळ भूभागावर भारताचा कब्जा असल्याचा दाव्यावर चर्चा झाली. पंतप्रधानांनी सीमावाशी संबंधित प्रश्नाला उत्तर देताना हे विधान केले होते. यावर खनल यांनी चुकीचा अर्थ काढण्यात आला असल्याचे म्हटले.
दरम्यान दोन्ही देशांमधील संबंध ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिकदृष्ट्या दृढ असल्याचे अधोरेखित केले. तसेच दोन्ही देशांनी रोटी-बेटीचे नाते असल्याचे सांगत सीमा खुली केली.
सीमावादावरुन नेपाळने ब्रिटनकडे मध्यस्थीची विनंती केली होती. मात्र, ब्रिटनकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने नेपाळने वाद द्विपक्षीय चर्चेतून सोडवण्यावर तयारी दर्शवली आहे.
Delhi: On Nepal Prime Minister Balen Shah’s comment about Nepal encroaching on Indian territory, Nepal’s Foreign Minister Shishir Khanal says, “My Ministry of Foreign Affairs has already clarified. Prime Minister was speaking when he was responding to a question on what is called… pic.twitter.com/7U8XEvOIpF — IANS (@ians_india) June 7, 2026