
India-US Trade Deal
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या उप-सहाय्यक अधिकारी बेथनी पॉलोस मॉरिसन यांनी भारतसोबतचा करार अंतिम टप्प्यात असल्याचा दावा केला. मंगळवारी (२३ जून) कॅपिटल हिल येथे फाउंडेशन फॉर इंडिया अँड इंडियन डायस्पोरा स्टडीज च्या कार्यक्रमात याची माहिती दिली.
त्यांनी दावा केला की पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या चांगल्या संबंधामुळे करारा गती मिळाली आहे. दोन्ही देशांत फेब्रुवारी २०२६ मध्ये व्यापार करार पूर्ण करण्याचा निर्धार करण्यात आला होता आणि आता या कराराच्या अत्यंत जवळ पोहोचलो आहोत असे बेथनी यांनी म्हटले.
बेथनी यांनी सांगितले की, डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि मोदी यांच्या समहतीनंतर दोन्ही देशांत वाटाघाटी चर्चा सुरु झाली होती. आतापर्यंत झालेल्या बैठकांमध्ये व्यापाराचा आढावा घेण्यात आला. यावरुन आम्ही कराराच्या अगदी शेवटच्या टप्प्यात पोहोचलो आहोत असे त्यांनी नमूद केले.
त्यांनी सांगितले की, हा करार १.४ अब्ज लोकांची भारतीय बाजारपेठे अमेरिकन वस्तूंसाठी खुली करण्याच्या अटीवर करण्यात येणार आहे. दोन्ही देशांमध्ये २०३० पर्यंत ५०० अब्ज डॉलर्सपर्यंत द्विपक्षीय व्यापार नेण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
बेथनी यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीर भारताच्या दौऱ्यावर आले आहे. सध्या त्यांची केंद्रीय वाणिज्य मंत्री व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्यासोबत अंतिम व्यापार कराराबात चर्चा सुरु आहे. हा करार जागतिक व्यापार आणि आर्थिक दृष्टीकानोतून अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. यामुळे अमेरिका-भारतातील तणालेले संबंध देखील पुन्हा रुळावर येतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.