
Indian LPG Tanker Green Sanvi Crosses Safelyfrom Strait Of Hormuz
मिळालेल्या माहितीनुसार, भारताचा एलपीजी टँकर ग्रीन सान्वीने ०३ एप्रिल २०२६ च्या यशस्वीपणे होर्मुझची खाडी पार केली आहे. या जहाजेवर सुमारे ४६,६५० मेट्रिक टन एलपीजी कार्गो आहे, जो भारताच्या घरगुती इंधनासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. ग्रीन सान्वीनंतर आता ग्रीन आशा आणि जग विक्रम हे दोन टँकरही लवकरच खाडीतून सुरक्षित बाहेर पडतील अशी सुत्रांकडून माहिती मिळाली आहे.
इराणने युद्धादरम्यान स्पष्ट केले होते की, जे देश शत्रूच्या श्रेणीत नाही त्यांच्या जहाजांना सुरक्षित रस्ता दिला जाईल. त्यांना केवळ इराणशी समन्वय साधून मार्ग मोकळा करायचा आहे. याच पार्श्वभूमीवर दुसरीकडे भारताने इराणशी सातत्याने उच्चस्तरीय राजनैतिक चर्चाही सुरु ठेवली होती. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्याशी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सातत्याने संवाद साधला. तसेच पंतप्रधान मोदींनी देखील इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याशी चर्चा केली होती. इराणने देखील दिलेल्या आश्वासनानुसार, भारत, चीन आणि रशियाच्या जहाजांना होर्मुझमधून सुरक्षितपणे जाऊ दिले आहे.
मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, अमेरिका-इस्रायल विरुद्ध इकाण युद्धाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझ खाडीत प्रचंड अस्थिरता निर्माण झाली आहे. पण या युद्धाच्या आगीतून आतापर्यंत भारताची सात LPG टँकर्स आणि १ कच्चा तेलाचा टँकर सुरक्षितपणे होर्मुझमधून बाहेर पडले आहेत. शिवालिक, नंदा देवी, पाइन गॅस, जग वसंत, बी डब्ल्यू टियर, बी डब्ल्यू एल्म, ग्रीन सान्वीआणि जग लाडकी या टँकर्सचा यामध्ये समावेश आहे.
The India-flagged LPG tanker, Green Sanvi, has safely crossed the Strait of Hormuz, according to ship-tracking data, becoming the seventh Indian vessel to transit the crucial route since the escalation of the West Asia conflict. The tanker is carrying around 46,650 metric tonnes… pic.twitter.com/jfR5lkAJ0X — The Statesman (@TheStatesmanLtd) April 4, 2026
Ans: ग्रीन सान्वी हा भारताचा LPG टँकर आहे. या जहाजावर सुमारे ४६,६५० मेट्रिक टन गॅस आहे, जो भारताच्या उर्जा सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
Ans: होर्मुझ मध्यपूर्वेतील एक समुद्रीमार्ग आहे, ज्यावर जगाच्या एकूण तेल साठ्यांपैकी २०पुरवठा या मार्गावरु जागतिक पातळीपर्यंत पोहोचवला जातो. हा मार्ग बंद झाल्यास जागतिक अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतो.
Ans: भारताचे इराणसोबत चांगले ऐतिहासिक संबंध आहेत. तसेच इराणने भारतासह काही देशांच्या जहाजांना सुरक्षित मार्ग देण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे भारतीय टँकर्स सुरक्षितपणे प्रवास करत आहेत.