Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pakistan Faces Acute Water : भारताचा मोठा निर्णय…! पाकिस्तानवर संकट कोसळण्याची शक्यता; होणार गोची? वाचा सविस्तर

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार रद्द केल्याने पाकिस्तानवर जलसंकट येण्याची शक्यता आहे. पाकिस्तानची पाणी साठवण्याची क्षमता कमी असून 80% शेती सिंधू नदीवर अवलंबून आहे. भारताच्या या निर्णयामुळे पाक अडचणीत येऊ शकतो.

  • By Priti Hingane
Updated On: Nov 02, 2025 | 04:04 PM
India's big decision...! Pakistan face water crisis?

India's big decision...! Pakistan face water crisis?

Follow Us
Follow Us:
  • पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताचा मोठा निर्णय
  • पाकिस्तानसोबतचा सिंधू जल करार रद्द स्थगित
  • पाकिस्तान जल संकटाच्या सावटाखाली
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं मोठा निर्णय घेत सिंधू जल करार रद्द केला.  मिळालेल्या माहितीनुसार, भारताने घेतलेल्या निर्णयासंदर्भात अहवाल समोर आलाय. त्यात जर भारताने सिंधू नदीचे पाणी रोखून ठेवले तर पाकिस्तानची बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते. ज्यामुळे पाकिस्तानला प्रचंड भीषण दुष्काळाला सामोरे जावे लागू शकते. तसेच, पाकिस्तानच्या शेजारील देशांची पाणी साठवायची क्षमता कमी असून त्याचा परिणाम कृषी, वीजनिर्मिती या क्षेत्रावर होऊ शकतो.

पाकिस्तानची शेती ८० टक्के सिंधू नदीवर अवलंबून असल्याने सिंधू जल करार स्थगित करणं पाकिस्तानसाठी हा धक्का मोठा समजला जात आहे. सिंधू, झेलम आणि चिनाब नद्यांच्या प्रवाहात भारताच्या निर्णयामुळे मोठी घट झाली असून, नद्यांमधील पाणीसाठा कमी होताना दिसत आहे. त्यामुळे पाकिस्तानसाठी ही धोक्याची घंटा आहे. इकोलॉजिकल थ्रेट रिपोर्टने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमध्ये सद्यस्थितीला असलेले धरण केवळ ३० दिवस सिंधू नदीचा प्रवाह रोखू शकते. त्यामुळे भारताच्या निर्णयामुळे पाकिस्तानची गोची झाली दिसून येत आहे.

हेही वाचा : Tanzania election protest : निवडणुकीचा निकाल लागताच देश पेटला..! हिंसाचारातील 700 जणांच्या मृत्यूचं नेमकं कारण काय?

पाकिस्तानची वाढती लोकसंख्या त्यातच भारतानं रोखलेलं सिंधू नदीचं पाणी यामुळे तिथल्या भागात पाण्याची मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. विशेषत: उन्हाळ्याच्या आणि हिवाळ्याच्या काळात या ठिकाणची परिस्थिती अत्यंत भीषण असल्याची शक्यता या अहवालात नमूद करण्यात आली आहे.

पहलगाममध्ये २२ एप्रिलला दहशतवादी हल्ला झाल्याने भारतामध्ये पाकिस्तान विरोधात संतापाची लाट उसळली होती. पाकिस्तान सोबतचे संबंध यामुळे प्रचंड ताणले गेले होते. नंतर या वाढत्या तणावामुळे भारतानं पाकिस्तान विरोधात निर्णय घेत सिंधू जल करार रद्द केला. सिंधू जल करार १९ सप्टेंबर १९६० रोजी दोन्ही देशांमध्ये करण्यात आला होता. त्यानुसार पूर्वेकडील सतलज, व्यास आणि रावी या नद्यांचा समावेश भारतात झाला होता. तर,पश्चिमेकडील सिंधू, झेलम, चिनाब नद्या पाकिस्तानला मिळाल्या होत्या.

हेही वाचा : पाकिस्तान घेणार IS दहशतवाद्यांची मदत, भारताला हादरवून टाकण्याचा रचलाय कट; गुप्तचर अहवालाचा धक्कादायक खुलासा

सद्यस्थितीला भारताची एवढी क्षमता नाहीये कि नदीचा प्रवाह पूर्णपणे रोखता येईल. मात्र, भारताचा छोटा निर्णय ही पाकिस्तानला महाग पडू शकतो. ज्यामुळे पाकिस्तानला मोठ्या पाणी संकटाला सामोरे जावे लागेल. सिंधू नदीचा प्रवाह भारताने रोखल्यास पाकिस्तानकडे कोणताच पर्याय उरणार नाही. कृषी क्षेत्र, पिण्याच्या पाण्याचा तुटवडा, वीज उत्पादन अशाप्रकारे अडचणी निर्माण होतील.

Web Title: Indias big decision pakistan face water crisis read in detail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2025 | 04:04 PM

Topics:  

  • Ind vs Pakistan
  • india
  • Pahalgam Terrorist Attack
  • pakistan
  • sindhu river
  • Water Crisis

संबंधित बातम्या

भारतीय क्रिप्टो गुंतवणूकदारांचा कल बदलला; दीर्घकालीन गुंतवणूक आणि बिटकॉइनला वाढती पसंती, कॉईनडीसीएक्सचा अहवाल
1

भारतीय क्रिप्टो गुंतवणूकदारांचा कल बदलला; दीर्घकालीन गुंतवणूक आणि बिटकॉइनला वाढती पसंती, कॉईनडीसीएक्सचा अहवाल

Ration Card : रेशन कार्डधारकांसाठी मोठा दिलासा! आता 35 किलोऐवजी प्रति व्यक्ती 7 किलो मोफत धान्य देण्याचा सरकारचा विचार
2

Ration Card : रेशन कार्डधारकांसाठी मोठा दिलासा! आता 35 किलोऐवजी प्रति व्यक्ती 7 किलो मोफत धान्य देण्याचा सरकारचा विचार

Investment Platform India : फंड्सइंडियाने सिक्योर्ड NCD द्वारे उभारले 44.6 कोटी रुपये; तंत्रज्ञान आणि गुंतवणूक सेवा विस्तारावर भर
3

Investment Platform India : फंड्सइंडियाने सिक्योर्ड NCD द्वारे उभारले 44.6 कोटी रुपये; तंत्रज्ञान आणि गुंतवणूक सेवा विस्तारावर भर

एअर इंडियाचे विमान थेट शत्रू राष्ट्राच्या हवाई हद्दीत शिरलं अन्…, जाणून घ्या विमानासोबत नेमकं काय घडलं?
4

एअर इंडियाचे विमान थेट शत्रू राष्ट्राच्या हवाई हद्दीत शिरलं अन्…, जाणून घ्या विमानासोबत नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.