
Indus Water Treaty
Quatar Gas Explosion : कतार हादरलं! सर्वात मोठ्या गॅस हबवर भीषण स्फोट; ५० हून अधिक जखमी, १८ बेपत्ता
ख्वाजा यानी पाकिस्तानी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, पाणी केवळ नैसर्गिक साधनसपत्ती नाही, तर पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षेचा महत्त्वाचा घटक आहे. यामुळे पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्याच क्षणी भारताविरोधात युद्धाला आम्ही मागेपुढे पाहणार नाही असे ख्वाजा यांनी म्हटले.
त्यांनी भारतावर सिंधू पाणी करारांतर्गत पाण्याच्या प्रवाहामध्ये अडथळा आणत असल्याचा आरोपही केला. त्यांनी म्हटले की, भारत पाकिस्तानला पाणी रोखण्यासाठी वेगाने पावले उचलत असल्याचे संकेत मिळाल्यास यावर योग्य ते उत्तर दिले जाईल असा इशाराही त्यांनी दिला.
आसिफ ख्वाजा यांनी हे विधान अशा वेळी केले आहे जेव्हा सोशल मीडियावर भारताचे केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर पाटी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ते भविष्यात पाकिस्तानकडे जाणारा सिंधू नदीचा प्रवाह रोखला जाऊ शकतो असे म्हटले आहे.
We will go to war with India 🇮🇳 if they do not change their behavior regarding water. Because water is life, and they are taking it away from us. • Pak Defence Minister: Khawaja Asif pic.twitter.com/GAuwUqtdVO — برهان الدین | Burhan uddin (@burhan_uddin_0) June 20, 2026
१९६० मध्ये भारत-पाकिस्तानमध्ये सिंधू पाणी वाटप करार करण्यात आला होता. या करारानुसार, सिंधू, चिनाब आणि झेलम नदीच्या पश्चिमेकडील पाण्याचा हिस्सा पाकिस्तानला देण्यात आला आहे. सध्या हा करार भारताने स्थगित केला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने हा निर्णय घेतला होता.
तसेच भारत हिमाचल प्रदेशात लिंक-३ प्रकल्पावर काम सुरु करणार आहे. या प्रकल्पांतर्गत चिनाब नदीचे पाणी व्यास नदीत वळवले जाणार आहे. यामुळे भारताला उपबल्ध जलस्त्रोतांचा अधिक वापर करता येईल असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. यासाठी २६. २ अब्ज रुपयांचे गुंतवणूक करण्यात आली आहे. मात्र या प्रकल्पामुळे पाकिस्तान तिथरबिथर झाला आहे.