
Evacuation Of Indians from Iran
Middle East Update : युद्ध टळलं? इराणचा ‘तो’ निर्णय अन् ट्रम्पचे सूर मवाळ; पडद्यामगं नेमकं काय घडलं?
दरम्यान भारत सरकाने या परिस्थितीचे गंभीर्याने दखल घेतल आपल्या नागरिकांच्या सुटकेसाठी तातडीने मोहिम सुरु केली. दरम्यान या मोहिमेअंतर्गत विशेष विमानांमधून भारतीय नागरिकांना परदेशी आणण्यास सुरुवात केली आहे. काही भारतीय मायदेशी परतले आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर या भारतीयांचे आनंदात स्वागत होत आहे.
#WATCH | Delhi | An Indian national who returned from Iran says, “I am pursuing an MBBS at Shiraz University of Medical Sciences, Iran. The situation there is normal. There are no internet services. We heard about protests in Iran but never saw anything like that…” pic.twitter.com/lIbcEBTidp — ANI (@ANI) January 16, 2026
दरम्यान इराणमधून परलेल्या भारतीयांनी तेथील परिस्थितीबाबत आपले अनुभव शेअर केले आहेत. काही लोकांच्या मते, इराणच्या प्रमुख शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्थिरता पसरलेली होती.निदर्शनांमध्ये वाहनांची, इमारतींची जाळपोळ आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान काही भागात मोठ्या प्रमाणात झाले आहे. तसेच इंटरनेट सेवा बंद पूर्णपणे बंद असल्याने आंतरराष्ट्रीय संपर्क साधणे कठीण होत होत. काहींनी तिथे फार वाईट परिस्थिती असल्याचे म्हटले आहे. पण काही भागांमध्ये अत्यंत शांततेचे वातावरण होते. लोकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी सहन कराव्या लागल्या नाहीत. तसेच सध्या वातावरण शांत होताना देखील दिसत असल्याचेही इराणमधून परतलेल्या भारतीय प्रवाशांनीही म्हटले आहे.
#WATCH | Delhi | “My wife’s aunt went to Iran on a pilgrimage…Iran has always been a good friend of India and we were very confident in the Modi government, which continuously supported…We thank the government of India for making this possible. We are very happy as our family… pic.twitter.com/RC3yvFr7Eu — ANI (@ANI) January 16, 2026
याच वेळी भारतीय नागरिकांनी इराणमधील दूतावासाने त्यांना पूर्णपणे सहकार्य केल्याचेही स्पष्ट केले आहे. इराणमधील भारतीय दूतावासाडून नागरिकांच्या निवास, प्रवास आणि सुरक्षिततेसाठी सर्व मदत करण्यात आले असल्याचे लोकांनी म्हटले आहे.
Ans: इराणमधून परतलेल्या भारतीयांनी सांगितलेल्या अनुभवानुसार, सध्या तेहरानसह काही भागांमध्ये हिंसाचाराची आग अजूनही धगधगत आहे. तर काही भागांमध्ये परस्थिती आटोक्यात आली आहे.
Ans: भारत सरकारने विशेष मोहिम राबवत तेहरानमधून विशेष विमानांमधून भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे मायदेशी आणले आहे. इराणमधील दूतावासानेही अराजकतेच्या परिस्थिती पूर्णपणे सहकार्य केले असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे.