Operation Sindoor: ड्रॅयगनने काढला विषारी फणा; पाकिस्तानला पाठिंबा देत भारतीय लष्करी कारवाई म्हटले 'खेदजनक' (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
बिजिंग: भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे. भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमधील 9 दहशतवाद्यांच्या ठिकाणांना लक्ष्य करत मिसाईल हल्ला केला. या हल्ल्यात 100 हून अधिक दहशतवादी ठार झाल्याचे म्हटले जात आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तान गोंधळलेला आहे. पाकिस्तानने दावा केला आहे की, भारताने नागरिकांच्या वस्तीवर हल्ला केला. परंतु भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर एअरस्ट्राईकद्वारे संदेश दिला आहे की, भारताचा पाकिस्तानशी नाही तर पोसलेल्या दहशतवाद्याशी लढा आहे. भारताने दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ला केला आहे.
याच वेळी भारताच्या ऑपरेशन सिंदूर मोहीमेनंतर पाकिस्तानचा मित्र देश चीनची प्रतिक्रिया समोर आलेली आहे. चीनला प्रसारमाध्यमांनी भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ वर प्रश्न विचारण्यात आले. यावर उत्तर देतान चीनच्या पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्त्यांनी, भारताच्या ऑपरेशन सिंदूरचे वर्णने खेदजनक म्हणून केले.
त्यांनी म्हटले की, “भारताची पाकिस्तानवरील ही कारवाई खेदजनक आहे. तसेच चीनने परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. “भारत आणि पाकिस्तान दोन्ही शेजारी देश आहेत, तसेच चीनचेही शेजारी देश आहेत. चीन देखील दहशतवादाला पूर्णपणे विरोध करतो. दोन्ही देशांनी शांतता आणि स्थैर्य राखावे. चीनने भारत आणि पाकिस्तानला संवादाच्या मार्गाने प्रश्न सोडवावा, जेणेकरुन परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होणार नाही.
“China finds India’s military operation early this morning regrettable. We are concerned about the ongoing situation. India and Pakistan are and will always be each other’s neighbours. They’re both China’s neighbours as well. China opposes all forms of terrorism. We urge both… pic.twitter.com/b8jLybfCPN
— ANI (@ANI) May 7, 2025
तसेच डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील भारताच्या ऑपरेशन सिंदूर वर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, हे लाजिरवाणे आहे. दोन्ही देशांनी संयम बाळगवा आणि तणाव कमी करण्यासाठी शांततेच्या मार्गाने चर्चा करावी. आशा आहे की, हे लवकर संपेल. तसेच त्यांनी असेही म्हटले, दोन्ही देशाचा इतिहास पाहिला तर असे काहीतरी घडणार याची कल्पना होतीच.
पहलगाम हल्ल्यात 28 निष्पाप लोकांचा बळी गेला होता. या हल्ल्यानंतर देशात संतापाची लाट उसळली होती. देशातून पाकिस्तानविरोधात कडक कारवाईची मागणी करण्यात येत होती. पंतप्रधान मोदींनी देखील कडक कारवाई करण्यात येईल असा इशार दिला होता. दरम्यान भारताने आज मध्यरात्रीच्या सुमारास पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केली. यामध्ये मुजजफराबाद, चकमारू, कोटली, सियालकोट, जैश ए मोहम्मद, हाफिज सईदच्या आणि लष्करच्या ठिकाणांवर हल्ला करण्यात आला आहे.