Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pahalgam Terror Attack: ‘… तर आम्ही हल्ला करु’ ; पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांची पुन्हा एकदा भारताला गिधड धमकी

जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध दिवसेंदिवस चिघळत चालले आहेत. पाकिस्तान वारंवार भारताला धमक्या देत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 03, 2025 | 05:07 PM
Pahalgam Terror Attack Pakistan’s Defence Minister threat Will strike any structure built to divert Indus water

Pahalgam Terror Attack Pakistan’s Defence Minister threat Will strike any structure built to divert Indus water

Follow Us
Close
Follow Us:

इस्लामाबाद: जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध दिवसेंदिवस चिघळत चालले आहेत. भारताने पाकिस्तानच्या दहशतवाद्याला पाठिंबा आणि पर्यटकांवरली भ्याड हल्ल्यानंतर कडक कारवाई केली आहे. भारत सरकारने सिंघू जल करार, आया निर्यातआणि पाकिस्तानसोबतच्या सर्व प्रकराचे संबंध कमी केले आहेत. यामुळे पाकिस्तान बिथरला आहे. पाकिस्तान वारंवार भारताला धमक्या देत आहे. दरम्यान पुन्हा एकदा पाकिस्तानने भारताला गिधड धमकी दिली आहे.

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पुन्हा एकदा भारतावर हल्ला करण्याचे म्हटले आहे. ख्वाजा यांनी म्हटवे आहे की, भारताने सिंधू नदीवर कोणत्याही प्रकारचे धरण बांधले आणि पाणी रोखण्याचा प्रयत्न केला तर याला पाकिस्तानवर थेट हल्ला मानला जाईल. सिंधू नदीवर धरण बांधणे दोन्ही देशांतील कराराचे उल्लघंन ठरेल. यानंतर पाकिस्तान शांत बसणार नाही. याचे योग्य प्रत्युत्तर देण्याच येईल. पाकिस्तान भारतावर हल्ला करेल. संरक्षण मंत्री ख्वाजा यांच्या या विधानाने पुन्हा एकदा मोठा गोंधळ उडाला आहे. पाकिस्तानकडून वारंवार मिळणाऱ्या धमक्यांवरुन हे सिद्ध होत आहे की, पाकिस्तान दहशतवादाला आणि दहशतवाद्यांना पाठिंबा देत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘मला पोप व्हायला आवडेल’; ट्रम्प यांनी पोप बनण्याची इच्छा व्यक्त करत शेअर केलेल्या AI फोटोने उडाली खळबळ

जिओ न्यूजला दिलेल्या एका मुलाखती दरम्यान पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा यांनी ही धमकी दिली. त्यांनी म्हटले की, एकतर्फी निर्णय हा सिंध कराराचे उल्लंघन आहे. भारताने पाणी थांबवण्यासाठी किंवा वळवण्यासाठी नदीवर कोणतेही कामकाज केले तर, बांधकाम पूर्णपणे नष्ट करण्यात येईल. त्यांनी म्हटले की, युद्ध केवळ तोफा आणि बंदुकांनी लढले जात नाही, पाणी थांबवणे हे देखील एक युद्ध आहे. पाण्याशिवाय लोक जगू शकत नाहीत.

आतंरराष्ट्रीय स्तरवार भारतावर दबाव आणण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न

भारताच्या कारवाई आधीच पाकिस्तानला महागात पडली आहे. भारताने सिंध जल करार थांबवला आहे. यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. तसेच भारत पाकिस्तानवर लष्करी कारवाईच्या तयारीत असल्याची भीती देखील पाकिस्तानला वाटत आहे. यामुळे पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्याशी चर्चा केली होती. यावेळी त्यांनी सिंध जल कराराला 25 कोटी पाकिस्तानी लोकांची जीवनरेख म्हणून संबोधले आणि भारतावर दबाव आणण्याची गरज व्यक्त केली.

यापूर्वी पाकिस्तानचे खासदार बिलवाल भुट्टो यांनीही भारताला सिंधू जल करारावरुन धमकी दिली होती. त्यांनी म्हटले होते की, सिंधू नदी पाकिस्तानची आहे, एकतर त्यात पाणी वाहिल किंवा त्यांचे रक्त. आता पुन्हा पाकिस्तानचे संरक्षण मंत्री या मुद्द्यावरुन हल्ल्याची धमकी दते आहे. सध्या पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- भारताने बांगलादेशवर दाखवली दया; टिक टॉक बनवताना देशाच्या हद्दीत शिरलेल्या दोन जणांना BSF ने पाठवले परत

Web Title: Pahalgam terror attack pakistans defence minister threat will strike any structure built to divert indus water

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2025 | 05:07 PM

Topics:  

  • Pahalgam Terror Attack
  • pakistan
  • World news

संबंधित बातम्या

Oil Politics : व्हेनेझुएलातील तेलाचे साठे का आहेत इतके खास? ज्यावर खिळल्या जागतिक महाशक्तींच्या नजरा
1

Oil Politics : व्हेनेझुएलातील तेलाचे साठे का आहेत इतके खास? ज्यावर खिळल्या जागतिक महाशक्तींच्या नजरा

इम्रान खान नव्हे, ईमान मजारीन, जिने पाकिस्तानी लष्कराचं जगणं केलं मुश्किल ; काय आहे प्रकरण?
2

इम्रान खान नव्हे, ईमान मजारीन, जिने पाकिस्तानी लष्कराचं जगणं केलं मुश्किल ; काय आहे प्रकरण?

परदेशी उद्योजकांना मिळणार UAE चे नागरिकत्व? सरकारने कायद्यात केला ‘हा’ नवा बदल
3

परदेशी उद्योजकांना मिळणार UAE चे नागरिकत्व? सरकारने कायद्यात केला ‘हा’ नवा बदल

अमेरिकेच्या साल्ट लेक सिटीच्या चर्चबाहेर अंदाधुंद गोळीबार ; हल्ल्यात २ जणांचा मत्यू, ५ हून अधिक जखमी 
4

अमेरिकेच्या साल्ट लेक सिटीच्या चर्चबाहेर अंदाधुंद गोळीबार ; हल्ल्यात २ जणांचा मत्यू, ५ हून अधिक जखमी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.