भारताच्या तीनही सैन्यदलाच्या संयुक्त 'त्रिशुल' सरावाने पाकिस्तानी सैन्य घाबरले
Pakistan Airspace Close: भारताचे तिन्ही सशस्त्र दल येत्या ३० ऑक्टोबरपासून पश्चिम सीमेवर संयुक्तपणे ‘त्रिशूल’ सराव सुरू करणार आहे. भारतीय लष्कराकडून या सरकार या सरावासाठी मोठी तयारीदेखील सुरू केली आहे. भारताने त्रिशूल सरावासाठी आधीच NOTAM (हवाई मोहिमांना सूचना) जारी केली आहे. भारताच्या या सरावामुळे पाकिस्तानी सैन्यात मात्र घबराट पसरली आहे.
भारतीय लष्कराच्या ‘त्रिशूल’ या संयुक्त लष्करी सरावामुळे पाकिस्तानमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने आपल्या हवाई क्षेत्रातील NOTAM (Notice to Airmen) ची व्याप्ती वाढवली आहे. विशेष म्हणजे, हे पाऊल पाकिस्तानच्या नौदल प्रमुखांच्या सर क्रीक परिसराच्या भेटीनंतर उचलण्यात आले आहे. इस्लामाबादने २८ आणि २९ ऑक्टोबरसाठी NOTAM जारी केले असून, त्यामुळे दोन्ही देशांच्या सीमावर्ती भागात हालचालींना अधिक गती मिळाली आहे.
कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच! पाकिस्तानने केली नापाक कृती; सीजफायरचे उल्लंघन केले अन् थेट…
भारतीय लष्कराचा ‘त्रिशूल’ सराव ३० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर दरम्यान पार पडणार आहे. या सरावात लष्कर, हवाई दल आणि नौदलाचे सुमारे ३०,००० सैनिक सहभागी होणार आहेत. हा सराव राजस्थानमधील जैसलमेरपासून ते गुजरातमधील सर क्रीकपर्यंत विस्तृत क्षेत्रात होणार असून, या सरावाद्वारे भारतीय सैन्याची समन्वय क्षमता आणि सामरिक सज्जता तपासली जाणार आहे.
भारतीय लष्कराच्या ‘त्रिशूल’ सरावाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तानदरम्यान तणाव वाढला आहे. अलीकडेच पाकिस्तानच्या नौदल प्रमुखांनी सर क्रीक परिसराला भेट देऊन लष्करी तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही सर क्रीक प्रदेशाला भेट दिली आणि तेथील सैनिकांशी संवाद साधला.
या भेटीदरम्यान राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला थेट इशारा देत म्हटले की, “पाकिस्तानने हे विसरू नये की सर क्रीकमधून जाणारा मार्ग थेट कराचीकडे जातो. या भागात शत्रूने कोणतेही आक्रमण करण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा इतिहास आणि भूगोल दोन्ही बदलतील.”
दरम्यान, पाकिस्तान विमानतळ प्राधिकरणाने (PAA) कराची आणि लाहोर दरम्यानच्या हवाई मार्गांमध्ये काही बदल जाहीर केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, हे बदल “हवाई वाहतुकीची सुरक्षितता आणि प्रभावी व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी” करण्यात आले आहेत. संरक्षण तज्ञांच्या मते, हे पाऊल भारताच्या ‘त्रिशूल’ लष्करी सरावाच्या पार्श्वभूमीवर उचलण्यात आले असण्याची शक्यता आहे. या घडामोडींमुळे सर क्रीक परिसरात लष्करी हालचाली आणि सामरिक तणाव अधिक वाढल्याचे दिसून येत आहे.
भारताचे लष्कर, नौदल आणि हवाई दल एकत्र येऊन मोठ्या प्रमाणावर ऑपरेशन्स, डीप स्ट्राइक्स आणि मल्टी-डोमेन वॉरफेअरचे समन्वय आणि सराव करणार आहे. हा सराव जैसलमेरहून सुरू होऊन गुजरातमधील कच्छपर्यंत पसरविला जाईल; कच्छचे समुद्राजवळचे प्रदेश असल्याने नौदल व हवाई दलाची महत्त्वाची भूमिका असेल.
सरावात भारतीय सैन्य अनेक स्वदेशी व अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शस्त्रे व प्रणाली चाचणीसाठी आणेल — यात टी-९०एस व अर्जुन टँक, हॉवित्झर, तसेच हवाई समर्थनासाठी अपाचे हल्ला हेलिकॉप्टर व हेवी-लिफ्ट हेलिकॉप्टर यांचा समावेश आहे. या चाचण्यांद्वारे वेगवेगळ्या घटकांमधील समन्वय, लॉजिस्टिक्स आणि बॉयो-सिक्युरिटीसह वास्तविक संघर्षपरिस्थितीत उपयुक्तता तपासली जाईल.
सैन्य तज्ज्ञे हे सरावाला सामरिक सज्जता वाढविणारी पावले मानतात — विशेषतः संचयी डीप-स्ट्राईक क्षमतांचे परीक्षण, हवाई-समुद्री समन्वय आणि मल्टी-डोमेन युद्धतंत्रातील सुधारणा यावर भर देण्यात येणार आहे.






