
Sheikh Hasina
शेख हसीना यांनी त्यांच्या विरोधात मृत्यूदंडाच्या निर्णयावर तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी म्हटले की, हा निर्णय न्यायपूर्ण नसून राजकीय हेतूने घेण्यात आला आहे. त्यांनी म्हटले की, मला मृत्यूची भीती नाही. १९७५ मध्ये मी माझ्या आई-वडील, भाऊ आणि जवळपास संपूर्ण कुटुंब गमावले. माझ्यावर ग्रेनेड हल्लाही झाला होता. पण तरीही मी प्रत्येक संकटावर मात करुन जनतेसोबत उभी राहिल्याचा दावा त्यांनी केला. त्यांनी याच वर्षी सर्व अडथळे दूर करुन मी बांगलादेशात परतेन असे म्हटले. तसेच त्यांनी , मी भारतात राहत असले, तरी माझे मन बांगलादेशातच आहे. माझे संपूर्ण आयुष्य देशातील जनतेसाठी समर्पित केले आहे. यामुळे शेवटच्या श्वासापर्यंत लोकशाहीसाठी संघर्ष ककरेल असे त्यांनी म्हटले.
याच वेळी त्यांनी राजकीय परिस्थितीवर टीका करताना अंतरिम सरकार आणि बीएनपीच्या नेतृत्वाखाली देशातील लोकशाही, कायद्याचे राज्य आणि नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आल्याचाही आरोप केला. त्यांनी अर्थव्यवस्था कमकुवत झाल्याचे सांगितले. तसेच अंतरिम सरकारमुळे देशात कट्टरतावाद वाढला आणि अजूनही वाढत असल्याचा दावा केला.
हसीना यांनी आपला पक्ष अवामी लीगवर लावलेल्या निर्बंधावरही भाष्य केले. त्यांनी म्हटले की, अवामी लीग हा केवळ एक राजकीय पक्ष नाही, तर नागरिकांच्या मनातील एक चळवळ आहे. सरकार आमची कार्यलये बंद करु शकते, राजकीय कार्यक्रमांवर बंदी घालू शकते. पण लोकांच्या मनातून अवामी लीगला हटवू शकत नाही असे त्यांनी म्हटले.
तसचे त्यांनी बांगलादेशात हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन आणि इतर अल्पसंख्याक समुदाय असुरक्षित असल्याचाही आरोप त्यांनी केला. तसेच त्यांनी मंदिरांवरील हल्ले, मूर्तीची तोडफोड आणि धार्मिक कार्यक्रमांमधील अडथळे निर्माण होत असल्याचे म्हटले.