महिंद्रा बोलेरो ही केवळ एक गाडी नसून भारताच्या ग्रामीण आणि निमशहरी भागाची जीवनवाहिनी मानली जाते. २००० मध्ये लाँच झाल्यापासून आजपर्यंत या गाडीने भारतीय ऑटोमोबाईल बाजारावर आपले वर्चस्व टिकवून ठेवले आहे. देशांतर्गत पर्यटन क्षेत्रात तर बोलेरोला ‘सर्वोच्च पसंती’ दिली जाते. या अफाट यशाची मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत,
१. दणकट बांधणी आणि अष्टपैलू रचना
महिंद्रा बोलेरोची मेटल बॉडी अत्यंत दणकट आहे. भारताच्या पर्यटन स्थळांकडे जाणारे रस्ते अनेकदा खड्डेमय, डोंगराळ आणि खडकाळ असतात. अशा खराब रस्त्यांवर आणि दुर्गम भागातही ही गाडी न थकता, न बिघडता सहज धावते. हिचा हाय ग्राऊंड क्लिअरन्स खडतर प्रवासात अत्यंत फायदेशीर ठरतो.
JSW मोटर्सचा दिवाळीत मोठा धमाका; पुढील ४ वर्षांतही येणार १५ नवीन गाड्या
२. किफायतशीर धावण्याचा खर्च
पर्यटन व्यवसायात चालणाऱ्या गाड्यांचे बजेट खूप महत्त्वाचे असते. बोलेरोचे इंजिन विश्वासार्ह असून ती उत्तम मायलेज देते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हिचा मेंटेनन्स खर्च इतर गाड्यांच्या तुलनेत अत्यंत कमी आहे आणि हिचे सुटे भाग भारतातील अगदी लहान गावातल्या गॅरेजमध्येही सहज उपलब्ध होतात.
३. ७ ते ९ आसनी क्षमता
भारतात सहलीला जाताना एकत्र कुटुंब किंवा मित्रांचा ग्रुप एकत्र जाणे पसंत करतो. बोलेरोमध्ये ७ ते ९ प्रवासी आरामात बसू शकतात. तसेच, पर्यटकांचे जड सामान ठेवण्यासाठी हिच्या टपावर कॅरिअर लावण्याची उत्तम सोय असते. कमी खर्चात जास्त प्रवासी वाहून नेण्याची ही क्षमता ट्रॅव्हल एजंट्ससाठी फायदेशीर ठरते.
Tata Avinya: टाटाची सर्वात भारी इलेक्ट्रिक कार आता नव्या डिझाईनसह येणार!
४. कमानी कमकुवत न होणारे सस्पेन्शन
डोंगराळ पर्यटन क्षेत्रे जसे की महाबळेश्वर, माथेरान, किंवा हिमालयातील दुर्गम भागात बोलेरोचे ‘लीफ स्प्रिंग’ सस्पेन्शन जड वजनासह चढण चढण्यास मदत करते.
थोडक्यात सांगायचे तर कमी किंमत, अफाट ताकद, जास्त जागा आणि ‘कही भी जाये, कभी न रुके’ हा विश्वास, यामुळेच महिंद्रा बोलेरो भारतीय पर्यटन व्यवसायाचा कणा बनली आहे.






