PM Modi यांचे Middle East मधील संघर्षावर भाष्य!
आपल्या संबोधनादरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सध्या सुरू असलेला संघर्ष आणि कोविड-19 महामारीमुळे निर्माण झालेले संकट, यांमध्ये तुलना केली. त्यांनी या गोष्टीवर भर दिला की, या दोन्हीही परिस्थितींमध्ये जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. त्यांनी पुढे असेही नमूद केले की, या युद्धामुळे परिस्थिती दीर्घकाळापर्यंत आव्हानात्मक राहू शकते आणि या वास्तवाचा सामना करण्यासाठी आपण सज्ज राहिले पाहिजे.
त्यांनी पुढे असेही नमूद केले की, ज्याप्रमाणे आपण सर्वांनी मिळून कोविड-19 च्या काळात आव्हानांचा सामना केला, त्याचप्रमाणे या वेळीही आपण एकजूट राहणे गरजेचे आहे. पंतप्रधान मोदींनी सावध केले की, काही व्यक्ती या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन अफवा पसरवू शकतात; त्यामुळे अशा लोकांपासून आपण सावध आणि दक्ष राहिले पाहिजे.
दरम्यान, इतर देशांमधील घडामोडी अशा संकटांच्या गंभीर परिणामांना अधोरेखित करतात. श्रीलंकेने शाळा आणि अत्यावश्यक नसलेल्या सरकारी कार्यालयांना सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. त्याचप्रमाणे, बांगलादेशाने शैक्षणिक उपक्रम ऑनलाइन पद्धतीवर वळवले असून, वीजकपात लागू करण्यास सुरुवात केली आहे. इंधनाचा वापर मर्यादित करण्याच्या उद्देशाने, पाकिस्तान आणि फिलिपिन्स या देशांनी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ‘चार दिवसांचा कामाचा आठवडा’ अनिवार्य केला आहे.
या परिस्थितीच्या आणि इंधनाच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर, आम्ही वाहन चालवण्याच्या अशा काही सवयींबद्दल माहिती देणार आहोत, ज्या तुम्हाला तुमच्या वाहनाचे मायलेज सुधारण्यास मदत करू शकतील.
नवीन Car घेतलीये? पहिल्या 3 सर्व्हिसिंग आहेत महत्त्वाच्या; दुर्लक्ष केल्यास बसेल मोठा फटका…
तुमच्या वाहनाचा मायलेज तुमच्या ड्रायव्हिंग स्टाइलवर अवलंबून असतो. तुम्ही कोणत्या गिअरमध्ये आणि किती स्पीडने वाहन चालवत आहात याचा त्यावर थेट परिणाम होतो. ट्रॅफिकमध्ये वारंवार गिअर बदलावे लागतात, पण शक्यतो कार थोडी स्पीड घेताच पुढच्या गिअरमध्ये शिफ्ट करा. कारण कमी गिअरमध्ये जास्त ॲक्सिलरेटर दिल्यास इंधनाचा वापर वाढतो.
गाडीची स्पीड सतत बदलल्यास फ्यूलचा वापर वाढतो. प्रत्येक वेळी तुम्ही गाडीचा वेग वाढवता तेव्हा इंजिनला जास्त ताकद लावावी लागते आणि त्यामुळे अधिक इंधन खर्च होते. तसेच, विनाकारण स्पीड कमी-जास्त केल्यास इंजिनवरही अतिरिक्त ताण येतो.
कार थांबलेली असताना इंजिन सुरू ठेवणे ही सामान्य सवय असली तरी त्यामुळे इंधनाचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. जर सिग्नलवर जास्त वेळ थांबावे लागणार असेल, तर इंजिन बंद करणे अधिक योग्य ठरते. ही छोटी सवय दीर्घकाळात तुमचे बरेच पैसे वाचवू शकते.






