
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
FSSAI ने दिल्लीतील हॉटेल-रेस्टॉरंट्सवर छापे टाकत कारवाई करण्याऐवजी हे स्पष्ट केलं की रेस्टॉरंट आणि हॉटेल मालकांवर कडक कारवाई करण्यापेक्षा, त्यांना आवश्यक नियमांचे पालन करण्यासाठी प्रोत्साहित करण्याची भूमिका घेत आहे.खरं तर, अन्न सुरक्षा शिखर परिषदेदरम्यान, एफएसएसएआयच्या संचालकांनी सांगितले की, अनेक व्यावसायिक अजूनही अन्न सुरक्षेशी संबंधित विविध कायद्यांबद्दल अनभिज्ञ आहेत. त्यामुळे, त्यांना संबंधित बाबींबद्दल शिक्षित करणे आणि नियम समजावून सांगणे महत्त्वाचे आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने रेस्टॉरंट मालकांनी हजेरी लावली होती.
या कार्यक्रमादरम्यान FSSAI अधिकाऱ्यांनी रेस्टॉरंट मालकांना महत्त्वाचा सल्लाही दिला.
त्यांना आपलं FSSAI लायसन्स अशा ठिकाणी लावण्यास सांगितलं ज्या ठिकाणावरुन ग्राहकांना ते सहज दिसेल.
प्रत्येक खाद्यपदार्थावर एक्सपायरी डेट स्पष्टपणे लिहिलेली असावी.
शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ वेगळे ठेवावेत.
ग्राहकांच्या तक्रारी गांभीर्याने घ्याव्यात.
अन्न साठवण्याच्या जागेच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे.
याव्यतिरिक्त, मांस, चीज आणि दुधाचा पुरवठा करणाऱ्या विक्रेत्यांची तपासणी केली जावी.
याव्यतिरिक्त, स्वयंपाकासाठी बराच काळ वापरलेले तेल न वापरण्याचा सल्ला देण्यात आला.
तुम्ही रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाणार असाल, तर त्यांच्याकडे FSSAI चं लायसन्स आहे की नाही हे तपासा.
अन्नाच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष द्या.
रेस्टॉरंटचं क्लीनिंग नीट आहे की नाही याची खात्री नक्की करा.
जेवण सर्व्ह करणार्या कर्मचाऱ्यांच्या स्वच्छतेकडे लक्ष देणे देखील महत्त्वाचं आहे.
जर तुम्हाला कोणत्याही अन्नापदार्थात काही दोष आढळले, तर ते खाऊ नका आणि रेस्टॉरंट मालकाकडे त्याची तक्रार करा.
Ghee Sale Ban : पनीरनंतर आता तूप ‘टार्गेट’वर, झाली कठोर कारवाई, ‘या’ राज्यात थेट 1 वर्षाची बंदी