• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Godrejs Save Water Initiative

गोदरेजचा ‘पाणी वाचवा’ उपक्रम; शाश्वत भविष्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

गोदरेजने जागतिक जल दिनानिमित्त जलसंवर्धन उपक्रम राबवून हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यावर भर दिला आहे. कंपनीने पाणी पुनर्वापर, पावसाचे पाणी संकलन आणि ऊर्जा बचतीसह शाश्वततेसाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 24, 2025 | 02:26 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

जागतिक जल दिनानिमित्त, गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुप (GEG) ने जलसंवर्धनासाठी नवा उपक्रम राबवून शाश्वततेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. हिमनद्या वितळण्यास कारणीभूत असलेल्या हरितगृह वायू उत्सर्जनाला आळा घालणे आणि जलसंपत्तीचे जतन करणे, हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. औद्योगिक क्षेत्राच्या जबाबदारीची जाणीव ठेवत, गोदरेजने पाणी पुनर्वापर, पावसाचे पाणी संकलन आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाद्वारे या समस्येला हात घालण्याचा संकल्प केला आहे.

‘रेनबो नेशन’ मधील पर्यटकांपैकी ६३.६ टक्के मुंबईकर; अ‍ॅन्युअल इंडिया रोडशोदरम्यान साउथ आफ्रिकन टूरिझमतर्फे देण्यात आली माहिती

गोदरेजच्या एन्व्हायरमेंट सस्टेनेबिलीटी प्रमुख तेजश्री जोशी म्हणतात, “पाणी ही समाज आणि अर्थव्यवस्थेची जीवनरेखा आहे. त्यामुळे त्याचे संवर्धन हे केवळ पर्यावरणपूरक नव्हे, तर सामाजिक आणि आर्थिक गरजही आहे. आम्ही नवकल्पक जलसंवर्धन धोरणे राबवून पाण्याचा सुयोग्य वापर सुनिश्चित करत आहोत. यामुळे पर्यावरणासोबतच संपूर्ण समाजाचा विकास होईल.” 2010-11 पासून, गोदरेजने आपल्या संपूर्ण उद्योग प्रक्रियेत पाण्याचा वापर 50% पेक्षा अधिक घटवला आहे. कंपनीने आपल्या सर्व सुविधांमध्ये पावसाचे पाणी साठवणूक प्रणाली विकसित केली आहे, ज्यामुळे जमिनीखालील जलसाठे पुनर्भरण शक्य होत आहे. मुंबईतील विक्रोळी कॅम्पसची वार्षिक पाण्याची साठवणूक क्षमता 4,25,000 घनमीटरपेक्षा अधिक आहे.

पाणी पुनर्वापराच्या दिशेनेही कंपनीने महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे. 2010-11 पासून, गोदरेजने 20 अब्ज लिटरपेक्षा जास्त सांडपाणी आणि पावसाचे पाणी पुनर्वापरित केले आहे. जलसंकटाने ग्रस्त भागांमध्ये ही योजना विशेष लाभदायक ठरली आहे. महाराष्ट्र, पंजाब आणि तामिळनाडूमधील ग्रामीण भागांमध्ये 100 दशलक्ष लिटरपेक्षा अधिक पाणीपुरवठा करण्यात आला आहे. स्थानिक समुदायांशी सहकार्य करत कंपनी तलाव पुनर्भरण, पाण्याचे योग्य व्यवस्थापन आणि शेतीस मदत करणारे उपक्रम राबवत आहे.

शेअर बाजारात तेजी मात्र टाटा ग्रुपचे शेअर्स का घसरले, गुंतवणूकदार चिंतेत, कारण काय?

गोदरेजच्या शाश्वततेच्या धोरणांमध्ये ऊर्जा बचत आणि हरित गृहनिर्माण यांचाही समावेश आहे. कंपनीने 320 दशलक्ष चौरस फूट क्षेत्रफळावर 650 हून अधिक ग्रीन बिल्डिंग्स उभारल्या आहेत, ज्यामुळे दरवर्षी 610,000 MWh पेक्षा अधिक ऊर्जेची बचत होते. तसेच, विक्रोळीतील खारफुटी जंगल दरवर्षी 60,000 टन कार्बन डायऑक्साइड साठवते. 2032 पर्यंत जलसंवर्धनाची क्षमता दुप्पट करणे आणि कार्बन उत्सर्जन 60% ने घटवणे, ही गोदरेजची महत्त्वाकांक्षी योजना आहे. भारताला भेडसावणाऱ्या पाण्याच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी, जल संवर्धनासह सरकारी आणि औद्योगिक सहकार्य अनिवार्य आहे. गोदरेजचा हा उपक्रम शाश्वततेच्या दिशेने एक आदर्श पाऊल आहे.

Web Title: Godrejs save water initiative

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2025 | 05:59 PM

Topics:  

  • Godrej Industries

संबंधित बातम्या

Godrej Enterprises Group ने १६ नवीन पेटंट्स मिळवले, विकासाला मिळणार चालना
1

Godrej Enterprises Group ने १६ नवीन पेटंट्स मिळवले, विकासाला मिळणार चालना

ताज्या बातम्या

पुढे वाचा
दुपारच्या जेवणात गरमागरम भाकरीसोबत खाण्यासाठी झटपट बनवा कारल्याची सुकी चटणी! जेवणाला येईल रंगतदार चव

दुपारच्या जेवणात गरमागरम भाकरीसोबत खाण्यासाठी झटपट बनवा कारल्याची सुकी चटणी! जेवणाला येईल रंगतदार चव

How the monetary system works: नोटा फक्त भारतात छापल्या जातात, तरी सरकार श्रीमंत का होत नाही

How the monetary system works: नोटा फक्त भारतात छापल्या जातात, तरी सरकार श्रीमंत का होत नाही

Bhiwandi Crime: भिवंडीत धर्मांतर रॅकेट उघडकीस; अल्पवयीन मुलींना बाप्तिस्मा देत होता अमेरिकन नागरिक, 2016 पासून…

Bhiwandi Crime: भिवंडीत धर्मांतर रॅकेट उघडकीस; अल्पवयीन मुलींना बाप्तिस्मा देत होता अमेरिकन नागरिक, 2016 पासून…

तंदुरी चिकन खायचंय मग हॉटेलला कशाला जायचं? घरीच बनवा अन् सर्वांना करा खुश

तंदुरी चिकन खायचंय मग हॉटेलला कशाला जायचं? घरीच बनवा अन् सर्वांना करा खुश

ICC Women Cricket World Cup Points Table : AUS vs SL सामना रद्द झाल्यानंतर भारताचे नशीब उजळले, जाणून घ्या गुणतालिकेचे गणित

ICC Women Cricket World Cup Points Table : AUS vs SL सामना रद्द झाल्यानंतर भारताचे नशीब उजळले, जाणून घ्या गुणतालिकेचे गणित

पिकलेलं केळ खायला आवडत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा हेअर मास्क, होतील माधुरी दीक्षितसारखे चमकदार केस

पिकलेलं केळ खायला आवडत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा हेअर मास्क, होतील माधुरी दीक्षितसारखे चमकदार केस

Samsung Galaxy A07: Samsung चे तीन नवीन स्मार्टफोन भारतात लाँच, 6,999 रुपये आहे सुरुवातीची किंमत! 5000mAh बॅटरीने सुसज्ज

Samsung Galaxy A07: Samsung चे तीन नवीन स्मार्टफोन भारतात लाँच, 6,999 रुपये आहे सुरुवातीची किंमत! 5000mAh बॅटरीने सुसज्ज

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.