
भारतीय रेल्वेसाठी ७६५ कोटींचा बूस्टर डोस (Photo Credit- X)
रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीसाठी अत्यंत व्यस्त असलेल्या दोन प्रमुख कॉरिडॉरवरील इलेक्ट्रिक ट्रॅक्शन सिस्टीम अपग्रेड केली जाणार आहे. यात प्रामुख्याने ईस्ट कोस्ट रेल्वेच्या १०६ किमी लांबीच्या दुव्वाडा-विशाखापट्टणम-विजयनगरम सेक्शनचा समावेश आहे. या कामासाठी सरकारने ३१८.०७ कोटी रुपये मंजूर केले आहेत. या विभागातील सध्याची १x२५ केव्ही यंत्रणा बदलून तिथे आधुनिक २x२५ केव्ही सिस्टीम कार्यान्वित केली जाईल. यामुळे गाड्यांचा वेग वाढण्यास मदत होईल आणि रेल्वेचे संचालन अधिक विश्वासार्ह होईल. २०२४-२५ च्या रेल्वे बजेटमधील राष्ट्रीय कार्यक्रमाचा हा एक भाग आहे.
Indian Railways approves ₹765+ crore upgrades across key corridors ₹318 cr for Duvvada–Vizag–Vizianagaram freight corridor, ₹259 cr for Raichur–Guntakal traction upgrade, and ₹187 cr for 1,000 km optical fibre network on Western Railway. pic.twitter.com/QKLv9BtzP2 — The News Drill™ (@thenewsdrill) March 10, 2026
रेल्वेमध्ये ‘लोको पायलट’ बनायचंय? जाणून घ्या महिना किती कमावतात आणि कोणत्या मिळतात सुविधा ?
साउथ सेंट्रल रेल्वेच्या गुंटकल विभागांतर्गत येणाऱ्या रायचूर-गुंटकल या १२६ किमी लांबीच्या मार्गासाठी २५९.३९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. हा मार्ग मुंबई-चेन्नई कॉरिडॉरचा एक महत्त्वाचा भाग आहे. या मार्गाचे आधुनिकीकरण झाल्यामुळे मालगाड्यांची ये-जा सुलभ होईल आणि वंदे भारत एक्सप्रेससारख्या हायस्पीड गाड्यांच्या संचालनाला मोठी गती मिळेल.
पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) दळणवळण यंत्रणेला बळकटी देण्यासाठी सरकारने १८७.८८ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. याअंतर्गत वडोदरा आणि मुंबई सेंट्रल विभागांमध्ये सुमारे १,००० किलोमीटरहून अधिक अंतरावर ४x४८ कोअर ऑप्टिकल फायबर केबल (OFC) नेटवर्क उभारले जाणार आहे.
या आधुनिक कम्युनिकेशन नेटवर्कचा सर्वात मोठा फायदा म्हणजे भारतीय बनावटीची ‘कवच’ ही रेल्वे सुरक्षा यंत्रणा लागू करणे सोपे होणार आहे. ‘कवच’ ही ट्रेनची टक्कर रोखणारी स्वदेशी प्रणाली असून, एलटीई (LTE) आधारित दळणवळणामुळे अपघात रोखण्यात आणि रेल्वे सुरक्षा अधिक भक्कम करण्यात मोठी मदत मिळणार आहे. या सर्व प्रकल्पांमुळे भारतीय रेल्वे केवळ वेगवानच नाही, तर तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम होणार आहे, असा विश्वास रेल्वे मंत्रालयाने व्यक्त केला आहे.
Pune-Nashik Railwayचा मार्ग बदलणार! GMRT ‘बफर झोन’मुळे केंद्र सरकारचा मूळ आराखड्याला नकार