(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
नेपाळचे एकमेव अब्जाधीश आणि चौधरी ग्रुपचे अध्यक्ष, बिनोद चौधरी यांनी हा अंदाज व्यक्त केला. त्यांच्या मते, या संपूर्ण प्रक्रियेसाठी किमान ५ अब्ज डॉलर्स, म्हणजेच अंदाजे ४८,००० कोटी रुपये खर्च येऊ शकतो. चौधरी यांनी सांगितले की, या नुकसानीची भरपाई केवळ आर्थिक माध्यमातून करता येणार नाही. तर त्यासाठी बराच वेळही लागू शकतो. नेपाळची भौगोलिक परिस्थिती पुनर्रचना प्रक्रियेला आणखी गुंतागुंतीची बनवू शकते, ज्यामुळे सरकार आणि खाजगी क्षेत्र या दोघांसमोर एक मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.
२६ ऑगस्ट रोजी, चीनला लागून असलेल्या नेपाळच्या पर्वतीय प्रदेशात अचानक आलेल्या पुरामुळे अनेक भागांवर परिणाम झाला. पाण्याच्या या अचानक आलेल्या प्रवाहाने अनेक रस्ते आणि पूल वाहून नेले. बऱ्याच गावांमध्ये पाणी शिरलं. या आपत्तीत मोठ्या संख्येने लोक मृत आणि बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे. वितळणाऱ्या हिमनद्यांमुळे हा पूर आला असल्याचा सांगितलं जात आहे.
चौधरी ग्रुपने पुरामुळे बाधित झालेल्यांना मदत करण्यासाठी सरकार, स्थानिक भागीदार आणि लष्करासोबत काम करण्याची तयारी केली आहे. कंपनीने बाधितांना मदत करण्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांना कामाला लावले आहे. या योजनेअंतर्गत,लोकांसाठी पुनर्वसन केंद्रे लवकरच स्थापन करण्याची योजना आहे. याव्यतिरिक्त, बाधित कुटुंबांसाठी घरे पुन्हा बांधणे, व्यवसाय पुन्हा सुरू करणे आणि नुकसान झालेल्या शाळांना आधार देण्याचे कामही केले जाईल. नेपाळचे एकमेव अब्जाधीश चौधरी ग्रुपचे अध्यक्ष बिनोद चौधरी यांच्याकडून मोठी मदत येत आहे.






