
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
केरळमधील कोट्टायम अन्न सुरक्षा प्राधिकरणाने केलेल्या तपासणीत पिठाच्या बॅचमध्ये क्लोरपायरीफॉस या कीटकनाशकाचे प्रमाण कायदेशीर मर्यादेपेक्षा खूप जास्त आढळले. कंपनीने २४ जुलै रोजी एक्सचेंज फाइलिंगमध्ये सांगितले की, अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना गव्हाच्या पिठाच्या एका बॅचमध्ये परवानगी असलेल्या मर्यादेपेक्षा जास्त कीटकनाशकाचे अवशेष आढळले, ज्यामुळे पतंजली फूड्सला ती बॅच परत मागवावी लागली.
पतंजली फूड्सने सांगितले की, त्यांना २४ जुलै रोजी केरळमधील कोट्टायम येथील अन्न सुरक्षा सहाय्यक आयुक्तांच्या कार्यालयातून रिकॉल ऑर्डर मिळाला. त्यानंतर माल परत मागवण्याचा आदेश देण्यात आले. कंपनीने सांगितले की, २० जुलै रोजीचा हा आदेश त्यांना २४ जुलै रोजी मिळाला. कंपनीने असेही म्हटले आहे की, ही समस्या केवळ गव्हाच्या पिठाच्या एका विशिष्ट बॅचशी संबंधित आहे आणि त्याचा कंपनीच्या इतर उत्पादनांवर कोणताही परिणाम झालेला नाही.
हे एक ऑर्गनोफॉस्फेट कीटकनाशक आहे, जे पिकांमधील कीटक मारण्यासाठी वापरले जाते. अन्नातून याचे अतिरिक्त प्रमाण घेतल्यास मज्जासंस्थेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. याच्या अतिसेवनामुळे चक्कर येणे, डोकेदुखी आणि पोट खराब होणे यांसारखे त्रासही होऊ शकतात. त्यामुळे हे बरंच घातक ठरु शकतं. या सगळ्याचा घातक परिणाम होऊ नये यासाठी हे धोक्याचं ठरु शकतं.
गव्हाच्या पिठात कीटकनाशके आढळल्याची आणि काही बॅचेस परत मागवल्याच्या बातमीचा परिणाम आज पतंजली फूड्सच्या शेअर्सवर होत आहे. या बातमीनंतर, पतंजली फूड्सचे शेअर्स ₹५५२ च्या उच्चांकावरून घसरून प्रति शेअर सुमारे ₹३४४ वर आले. ही ₹२०८.५५ ची घसरण आहे. याचा अर्थ, स्टॉक त्याच्या उच्चांकावरून ३७.७४% ने खाली आला आहे. त्याचा ५२-आठवड्यांचा नीचांक ₹३२८.२० आहे, म्हणजेच स्टॉक सध्या त्याच्या नीचांकाच्या अगदी जवळ आहे.