(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सर्वसामान्य माणसाची सर्वात मोठी चिंता दूर करण्यासाठी, मोदी सरकार एक अद्भुत योजना आणली आहे. या योजनेचं नाव ‘प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना’ (PM-SYM) असं आहे. योजनेचं सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला दरमहा फक्त ५५ रुपये म्हणजे दिवसाला २ रुपयांपेक्षा कमी रुपये वाचवायचे आहेत. मग तुम्हाला वयाच्या ६० व्या वर्षांनंतर ३००० रुपयांची हमी असलेली पेन्शन मिळेल.
ही असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी भारत सरकारची एक उत्कृष्ट पेन्शन योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत, जर तुम्ही तुमच्या वयानुसार दरमहा थोडी थोडी रक्कम जमा केली, तर सरकार तुमच्या सेवानिवृत्तीनंतर म्हणजेच वयाच्या ६० नंतर आयुष्यभर तुम्हाला दरमहा ₹३,००० म्हणजेच वार्षिक ₹३६,००० रुपयाची हमी पेन्शनची मिळणार.
या योजनेचा सर्वात मोठा फायदा हा आहे की, तुम्ही दरमहा जेवढी रक्कम जमा करता, तेवढीच रक्कम सरकार तुमच्या पेन्शन खात्यात जमा करते. याचा अर्थ असा की, जर तुमचा हप्ता ₹५५ असेल, तर सरकारदेखील दरमहा स्वतःच्या खिशातून ₹५५ तुमच्या खात्यात जमा करते.
ही योजना विशेष म्हणजे सर्वसामान्य माणसासाठी तयार करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी, तुमचे वय १८ ते ४० वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. तुमचे मासिक उत्पन्न ₹१५,००० किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. व्यवसायाच्या बाबतीत, तुम्ही असंघटित क्षेत्रातील असणे आवश्यक आहे. यामध्ये रस्त्यावरील विक्रेते, रिक्षाचालक, बांधकाम कामगार, शिंपी, चांभार, धोबी किंवा घरगुती काम करणारे यांचा समावेश असू शकतो. तुम्ही EPFO, NPS किंवा ESIC सारख्या इतर कोणत्याही सरकारी पेन्शन/PF योजनेचे सदस्य असता नयेत आणि तुम्ही आयकर भरत नसावेत.
तुमचा प्रीमियम योजनेत सामील होताना तुमच्या वयावर अवलंबून असतो.
१. जर तुम्ही वयाच्या १८ व्या वर्षी गुंतवणूक करत असाल, तर तुम्हाला दरमहा ₹५५ जमा करावे लागतील.
२. जर तुम्ही वयाच्या २९ व्या वर्षी गुंतवणूक करत असाल, तर तुम्हाला दरमहा ₹२०० गुंतवावे लागतील.






