
देशात धावणार ७ नवीन बुलेट ट्रेन! मुंबई, पुण्यासह 'या' ८ शहरांचा कायापालट होणार (Photo Credit- X)
हे नवीन कॉरिडॉर सध्याच्या पारंपारिक रेल्वे मार्गांपासून स्वतंत्रपणे विकसित केले जाणार आहेत. यामुळे रस्ते वाहतूक आणि रेल्वेच्या मुख्य मार्गांवरील दबाव लक्षणीयरीत्या कमी होईल. अर्थमंत्र्यांच्या मते, हे कॉरिडॉर केवळ प्रवासाचा वेळ वाचवणार नाहीत, तर देशाच्या आर्थिक आणि सांस्कृतिक विकासाला मोठी गती देतील.
या प्रकल्पांतर्गत प्रामुख्याने देशातील आठ महत्त्वाची शहरे आणि महानगरे हाय-स्पीड नेटवर्कने जोडली जातील. या शहरांची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
१. मुंबई (आर्थिक राजधानी): भारताचे वित्तीय केंद्र. आरबीआय, सेबी आणि देशातील प्रमुख कॉर्पोरेट कंपन्यांची मुख्यालये येथे आहेत. या कॉरिडोरमुळे मुंबईची कनेक्टिव्हिटी अधिक वेगवान होईल.
२. पुणे (ऑटो आणि अभियांत्रिकी हब): पुण्याला ‘पूर्वेचे ऑक्सफर्ड’ म्हटले जाते. ऑटोमोबाईल उद्योग, एमएमएमई क्षेत्र आणि आयटी हबसाठी हे शहर प्रसिद्ध आहे.
३. हैदराबाद (औषध आणि तंत्रज्ञान केंद्र): ‘फार्मसी कॅपिटल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हैदराबादमध्ये मोठ्या औषध कंपन्या आणि गुगल, अमेझॉनसारख्या टेक कंपन्यांची कार्यालये आहेत.
४. बंगळुरू (सिलिकॉन व्हॅली): भारताची आयटी राजधानी. येथे सर्वाधिक स्टार्टअप्स आणि संशोधन संस्था (उदा. ISRO, IISc) आहेत.
५. चेन्नई (ऑटोमोबाईल हब): दक्षिण भारताची ऑटोमोबाईल राजधानी. येथे ह्युंदाई, टीव्हीएस सारख्या मोठ्या कंपन्यांचे उत्पादन प्रकल्प आहेत.
६. दिल्ली (राष्ट्रीय राजधानी): देशाचे राजकीय केंद्र आणि धोरणात्मक निर्णयांचे केंद्र. उत्तर भारताचे मुख्य ट्रान्सपोर्ट हब म्हणून दिल्ली महत्त्वाची आहे.
७. वाराणसी (सांस्कृतिक आणि धार्मिक राजधानी): हिंदू श्रद्धेचे प्रमुख केंद्र. धार्मिक पर्यटनातून आर्थिक वृद्धी साधण्यासाठी वाराणसीला या कॉरिडोरशी जोडले जाणार आहे.
८. सिलिगुडी (ईशान्येचे प्रवेशद्वार): ईशान्य भारतातील राज्यांना उर्वरित भारताशी जोडणारा हा अत्यंत धोरणात्मक मार्ग आहे. चहा व्यापार आणि लॉजिस्टिक्ससाठी हे शहर ओळखले जाते.
या हाय-स्पीड कॉरिडॉरमुळे आयटी केंद्रे, उत्पादन क्लस्टर्स आणि वित्तीय केंद्रांमधील प्रवासाचा वेळ कमालीचा कमी होईल. यामुळे मालाची ने-आण जलद होईल आणि लॉजिस्टिक खर्च कमी होण्यास मदत होईल. प्रामुख्याने उत्पादनावर आधारित अर्थव्यवस्थेला यामुळे मोठी उभारी मिळेल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे.
अर्थसंकल्प विकसित भारताच्या दिशेने टाकलेले ठोस पाऊल ठरणार; ओबीसी नेते हेमंत पाटील यांचा विश्वास