मुंबई- सर्वसामान्यांसाठी एक महत्त्वाची तसेच कामाची बातमी येत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. तुमच्य कर्जाच्या हफ्तामध्ये कोणताही बदल होणार नाही. कारण रेपो रेटमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय आरबीआयने घेतला आहे. आधीचाच रेपो रेट कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikanta Das) यांनी अशी माहिती दिली आहे. यामुळे तुमच्या कर्जाचा हप्ता वाढणार नसल्यानं आरबीआयनं सामान्यांना तसेच कर्जदरांना मोठा दिलासा दिला आहे.
बजेटनंतर रेपो रेटमध्ये झाली होती वाढ
दरम्यान, केद्रीय बजेट फेब्रुवारीत सादर करण्यात आले होते, त्यानंतर रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आली होती. परिणामी कर्जाच्या व्याजदरात वाढ झाली तसेच कर्जाच्या हफ्तामध्ये देखील वाढ झाली होती. त्यामुळं पुन्हा रेपो रेटमध्ये वाढ होणार का? अशी चर्चा सुरु होती. मात्र रेपो रेटमध्ये कोणतेही वाढ किंवा बदल करण्यात आलेली नाही, त्यामुळ ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. महागाई आटोक्यात येत असल्यानं आरबीआयच्या रेपो रेटमध्ये बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे.
महागाई आटोक्यात येतेय?
महागाई आटोक्यात येत असल्यानं आरबीआयच्या रेपो रेटमध्ये बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. असं आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितलं आहे. महागाईच्या पार्श्वभूमीवर देशाच्या मध्यवर्ती बँकेसमोर अजूनही अनेक आव्हाने आहेत. आमचे काम अजून संपलेले नाही. सध्या आरबीआयचा रेपो रेट 6.50 टक्के आहे. जोपर्यंत महागाई दर आरबीआयने ठरवून दिलेल्या लक्ष्याच्या जवळपास किंवा त्याखाली येत नाही तोपर्यंत आम्हाला अथक प्रयत्न करावे लागतील, असं आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटले आहे.