नुकताच दहावीचा निकाल जाहीर झाला. आता विध्यार्थ्यांना लगबग लागली आहे ती अकरावीला प्रवेश घ्यायची. अकरावीची प्रवेश प्रक्रिया आज (२६ मे २०२५ ) पासून सुरु झाली आहे. अकरावी प्रवेश प्रक्रिया २१ मे पासून घोषित करण्यात आली होती. परंतु वेबसाईट क्रश झाल्याने प्रवेश प्रक्रिया थांबवण्यात आली होती. आज पासून पुन्हा नव्याने अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरवात झाली आहे. चला जाणून घेऊया प्रवेश प्रक्रियेची शेवटची तारिक काय आहे आणि फॉर्म कसा भरायचा?
दहावी-बारावीतील गुणवंत आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणार ३० हजारांचं रोख पारितोषिक
महाराष्ट्र शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग शैक्षणिक वर्ष २०२५ – २६ साठी प्रथम वर्ष कनिष्ठ महाविद्यालय इयत्ता 11 वीची प्रवेश प्रक्रिया आज पासून सुरु करण्यात आली आहे. आज सकाळी ११ वाजता सुरु झाली आहे.
शेवटची तारिक काय?
२०२५ -२६ साठी तुम्ही ३ जून २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत करू शक्तील. यानंतर अर्ज नोंदणी प्रक्रिया बंद होईल. विध्यार्थी या वेळेत ऑनलाईन नोंदणी करू शकतात आणि अर्ज भरू शकतात. तसेच इच्छित कनिष्ठ महाविद्यालयांची यादी देखील देऊ शकतात.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्येक अर्जदाराला पसंती यादीचा भाग म्हणून किमान एक कनिष्ठ महाविद्यालय आणि जास्तीत जास्त दहा महाविद्यालये निवडावी लागतील. विद्यार्थ्यांना mahafyjcadmissions.in या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करता येईल आणि इतर योग्य माहिती मिळणार आहे.
अकरावीत प्रवेश घेणाऱ्यांनो ‘या’ तारखा लक्षात ठेवा
प्रवेशासाठी अर्ज कसा करावा?
फॉर्म भरायला अडचण आल्यास येथे संपर्क करा
जर तुम्हाला प्रवेश प्रक्रियेत काही अडचण आली किंवा फॉर्म अपलोड झाला नाही किंवा तांत्रिक समस्या आल्या तर त्यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाने 7669100257 किंवा 18003132164 या हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. हे क्रमांक सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत सुरू राहणार आहेत.
किती कॉलेज किती जागा?
अकरावी प्रवेशासाठी यंदा महाराष्ट्रातील 9,281 कनिष्ठ महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयात एकूण 20,43,254 जागा आहेत. यामध्ये विज्ञान शाखेत 8,52,206 जागा, वाणिज्य शाखेत 5,40,312 जागा आणि कला शाखेत 6,50,682 जागा आहेत.
प्राध्यापक होण्याची तयारी करत आहात ? मग ‘ही’ बातमी तुमच्यासाठी आहे