Agniveer Job Plan: अग्निवीरांसाठी मोठी बातमी! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
अग्निपथ योजनेत भरती झालेली पहिली बॅच जानेवारी 2027 मध्ये बाहेर येणार आहे. ही बॅच 1 जानेवारी 2023 ला भरती झाली होती. यामध्ये 19 हजार पेक्षा जास्त अग्निवीर आहेत. त्यामुळे सरकारला आता घाई करावी लागत आहे.
आधी ठरल्याप्रमाणे 25 टक्के अग्निवीरांना सैन्यातच कायम ठेवलं जाणार आहे. पण आता त्यासाठीची प्रोसेस बदलली आहे. आधी सगळे चार वर्ष पूर्ण करून बाहेर पडायचे आणि मग 25 टक्के लोकांना परत घेतलं जायचं. पण आता असं नाही होणार. आता चार वर्ष पूर्ण व्हायच्या आधीच आतमध्ये परीक्षा आणि त्यांच्या कामाचं मूल्यांकन केलं जाणार आहे. त्यावरून मेरीट लिस्ट बनवली जाईल आणि कोण 25 टक्के मध्ये राहणार आहे हे आधीच ठरवलं जाईल. म्हणजे त्यांच्या नोकरीत कुठलाही गॅप येणार नाही. ते डायरेक्ट नियमित सैनिक बनतील.
खरा प्रश्न हा 75 टक्के लोकांचा आहे. जे सैन्यात कायम राहणार नाहीत त्यांच्यासाठी पण सरकारने प्लॅन बनवला आहे. त्यांना दुसऱ्या सरकारी नोकऱ्यांमध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे. यासाठी गृह मंत्रालय एक खास पोर्टल बनवत आहे. त्या पोर्टलवरूनच त्यांची भरती केली जाईल. उद्देश हाच आहे की सैन्यातून बाहेर पडण्याआधीच त्यांच्या हातात दुसऱ्या नोकरीचं ऑफर लेटर असावं.
सरकारने अग्निवीरांसाठी अनेक ठिकाणी आरक्षण पण ठेवलं आहे.BSF, CRPF, CISF, ITBP आणि आसाम रायफल्स मध्ये कॉन्स्टेबल आणि रायफलमन पदासाठी 50 टक्के आरक्षण आहे. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे त्यांना लेखी परीक्षा, फिजिकल टेस्ट द्यावी लागणार नाही. त्यातून त्यांना सूट दिली आहे.रेल्वेत पण आरक्षण दिलं आहे.
NLSIU Fellowship: पदवीधरांना महिन्याला मिळणार रू. 50000 ची फेलोशिप, 30 ऑक्टोबरपर्यंत करू शकता अर्ज
लेव्हल 1 च्या पोस्टसाठी 10 टक्के आणि लेव्हल 2 च्या पुढच्या पोस्टसाठी 5 टक्के आरक्षण ठेवलं आहे. याशिवाय केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक विभागांमध्ये पण अग्निवीरांना प्राधान्य दिलं जात आहे.
अग्निपथ योजनेचा नियम साधा आहे. चार वर्ष सैन्यात नोकरी करायची. त्यातले 25 टक्के सैन्यातच कायम होतील आणि 75 टक्के बाहेर येतील. पण बाहेर आल्यावर त्यांना नोकरीसाठी वणवण फिरावं लागू नये म्हणून ही नवीन योजना आहे.चार वर्ष देशसेवा केल्यानंतर जेव्हा अग्निवीर बाहेर येईल तेव्हा त्याच्या हातात दुसऱ्या नोकरीचा मार्ग तयार असेल, याची हमी सरकार घेत आहे.या निर्णयामुळे अग्निवीर आणि त्यांच्या घरच्यांमध्ये असलेली भीती थोडी कमी होईल. चार वर्षानंतर बेरोजगार होऊ असं त्यांना वाटणार नाही. सरकारचा हा निर्णय खरंच स्वागतार्ह आहे.
Maharashtra Board Exams 2027: 10वी – 12वी परिक्षांचे वेळापत्रक जाहीर, कधी सुरू होणार परीक्षा






