Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ई-निरसन’ प्रणालीचे लोकार्पण; विद्यार्थ्यांच्या तक्रार निवारणाला डिजिटल वेग, चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या तक्रार निवारणासाठी ‘ई-निरसन’ ही एआय-आधारित डिजिटल प्रणाली विकसित केली असून तिचे उद्घाटन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 22, 2026 | 03:09 PM
‘ई-निरसन’ प्रणालीचे लोकार्पण; विद्यार्थ्यांच्या तक्रार निवारणाला डिजिटल वेग, चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

‘ई-निरसन’ प्रणालीचे लोकार्पण; विद्यार्थ्यांच्या तक्रार निवारणाला डिजिटल वेग, चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘ई-निरसन’ प्रणालीचे लोकार्पण
  • विद्यार्थ्यांच्या तक्रार निवारणाला डिजिटल वेग
  • चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुभारंभ
नीता परब, मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या तक्रार निवारणासाठी ‘ई-निरसन’ ही अत्याधुनिक डिजिटल प्रणाली विकसित केली अजून विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या साह्याने सेवा अधिक सुलभ व पारदर्शक देण्याचा प्रयत्न आहे असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. ‘ई-निरसन प्रणालीचे ‘उद्घाटन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत, परीक्षा नियंत्रक डॉ. नरेंद्र जाधव तसेच कुलसचिव डॉ. शेष उपस्थित होते.

‘त्या’ विद्यार्थ्यांची परीक्षा सुरळीत पार! प्राचार्य उद्या अहवाल सादर करणार, दोन केंद्रावर घेतल्या परीक्षा

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांना परीक्षा निकाल, गुणपत्रिका, पुनर्मूल्यांकन, प्रमाणपत्र आदी संदर्भातील तक्रारींसाठी प्रत्यक्ष लोणेरे येथे जाण्याची आवश्यकता भासू नये, यासाठी ‘ई-निरसन’प्रणाली विकसित करण्यात आली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानावर आधारित ही प्रणाली तक्रारींचे स्वयंचलित वर्गीकरण करून त्या संबंधित विभागाकडे तात्काळ पाठवते. तसेच विद्यार्थ्यांना तक्रारीची सद्यस्थिती ‘लाइव्ह ट्रॅकिंग’द्वारे पाहता येते. या प्रणालीमुळे तक्रार निवारण प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक व कार्यक्षम होणार असून विद्यार्थ्यांचा वेळ व खर्च मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून परीक्षा निकालातील विलंब, गुणपत्रिकांमधील त्रुटी तसेच तक्रार नोंदवण्यासाठी प्रत्यक्ष लोणेरे येथे उपस्थित राहण्याची अट यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी होती. या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विषयाची गंभीर दखल घेत सातत्याने आढावा बैठका घेतल्या आणि कायमस्वरूपी उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिले. त्यानंतर अनुभवी शिक्षणतज्ज्ञ डॉ. रजनीश कामत यांची कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली. डॉ. कामत यांच्या नेतृत्वाखाली परीक्षा नियंत्रक डॉ. नरेंद्र जाधव आणि कुलसचिव डॉ. शेष यांच्या समन्वयातून विद्यापीठाने तब्बल ८५ टक्के परीक्षा निकाल यशस्वीपणे जाहीर केले. या कामगिरीसह ‘ई-निरसन’ प्रणालीमुळे तक्रार निवारणाची प्रक्रिया अधिक वेगवान आणि कार्यक्षम होणार आहे.

लाइव्ह ट्रॅकिंग व पूर्ण पारदर्शकता – तक्रार नोंदल्यानंतर विद्यार्थ्याला एक विशिष्ट ‘तक्रार क्रमांक’ मिळतो. या क्रमांकाच्या सहाय्याने विद्यार्थी ॲपवर आपल्या तक्रारीची सद्यस्थिती कधीही, कुठूनही तपासू शकतो. तक्रार कोणत्या विभागाकडे आहे, कोण हाताळत आहे आणि कधी सोडवली जाईल, या सर्व माहितीचे रियल-टाइम अपडेट मिळतात. प्रत्येक टप्प्यावर एसएमएस व ईमेलद्वारे विद्यार्थ्याला सूचना दिली जाते.

11th admission process : अकरावीला प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा…; काय आहे अंतिम अंतिम मुदत?

Web Title: E nirson system launch batub student grievance digital solution

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 03:09 PM

Topics:  

  • ai
  • education
  • maharshtra

संबंधित बातम्या

‘त्या’ विद्यार्थ्यांची परीक्षा सुरळीत पार! प्राचार्य उद्या अहवाल सादर करणार, दोन केंद्रावर घेतल्या परीक्षा
1

‘त्या’ विद्यार्थ्यांची परीक्षा सुरळीत पार! प्राचार्य उद्या अहवाल सादर करणार, दोन केंद्रावर घेतल्या परीक्षा

संगीत क्षेत्रात AI चा वाढता वापर! 97% वापरकर्त्यांना ओळखणे कठीण, काय म्हणतंय संशोधन?
2

संगीत क्षेत्रात AI चा वाढता वापर! 97% वापरकर्त्यांना ओळखणे कठीण, काय म्हणतंय संशोधन?

शहा महिला महाविद्यालयात ‘ऑन द जॉब ट्रेनिंग’; विद्यार्थिनींना शिक्षणासोबत करिअरची नवी संधी
3

शहा महिला महाविद्यालयात ‘ऑन द जॉब ट्रेनिंग’; विद्यार्थिनींना शिक्षणासोबत करिअरची नवी संधी

डिजीटल महबूबानेच दिली मृत्यूची भेट…! AI च्या प्रेमात पडलेल्या व्यक्तीने का संपवलं स्वत:च आयुष्य?
4

डिजीटल महबूबानेच दिली मृत्यूची भेट…! AI च्या प्रेमात पडलेल्या व्यक्तीने का संपवलं स्वत:च आयुष्य?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.