
Triple Murder Case: १६ वर्षांच्या मुलाने भाऊ, वहिणी आणि ३ वर्षांच्या भाच्याची केली निघृण हत्या, धक्कादायक कारण समोर...
Nagpur Crime: संतापजनक! मदरसा शिक्षकाकडून 10 अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण; आरोपी फरार
झोपेतच केला खून
ही घटना बांसगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असून मृतांच्या राहत्या घरी झोपेतच त्यांची हत्या करण्यात आल्याचे समोर येत आहे. दोन मजली घराच्या पहिल्या मजल्यावर अमित गुप्ता, त्यांची पत्नी रंजना, नऊ वर्षांची मुलगी आणि तीन वर्षांचा मुलगा राहत होता, तर दुसऱ्या मजल्यावरील खोलीत धाकटा भाऊ राहत होता. रात्री अचानक ३ वाजताच्या सुमारात आरोपी अमित यांच्या खोलित घुसला आणि त्याने झोपेतच भाऊ, वहिणी आणि तीन वर्षांच्या भाच्याचा खून केला. नऊ वर्षांच्या भाचीने ही घटना आपल्या डोळ्यांनी पाहिली ज्यानंतर ती आरडाओरड करत खोलीतून बाहेर पळाली. मुलीचा आरडाओरड ऐकत घरात असलेले आजी-आजोबा खोलीजवळ पोहोचले तर त्यांना खोलित रक्ताचा सडा पसरलेला दिसला. घटनेनंतर आरोपी शांतपणे आपल्या खोलित जाऊन बसल्याचे सांगण्यात येत आहे. वडिल हरिलाल गुप्ता यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आण त्यांनी आरोपीला आपल्या ताब्यात घेतले.
खुनाचे कारण काय?
या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले. एकाच घरात राहणाऱ्या किशोरवयीन मुलाने आपल्याच कुटुंबियांना मारण्याचा निर्णय का घेतला याचा शोध पोलिसांनी सुरु केला. पोलिसांच्या शोधकार्यात समजले की, या हत्याकांडामागचे मूळ कारण हे काैंटुबिक कलह होता. आरोपी गुप्ता कुटुंबातील छोटेसे दुकान चालवत होता. काही महिन्यांपूर्वीच त्याचा मोठा भाऊ गावावरुन घरी परतला ज्यानंतर त्याला आपल्या हातातून दुकान जातंय की काय अशी भिती वाटू लागली. त्याचबरोबर भावाच्या येण्याने कुटुंबाचे आपल्यावरील प्रेम आणि महत्त्व कमी होईल अशी भावना त्याच्या मनात निर्माण झाली. याच कारणामुळे आणि मनातील मत्सरामुळे आरोपीने मोठा भाऊ, त्याची पत्नी आणि मुलांना मारण्याचा कट रचला.
वडिल रुग्णालयात दाखल
आरोपी मुलाचे वडिल हरीलाल गुप्ता हे हार्ट पेशंट असल्याने या घटनेनंतर त्यांची प्रकृती आणखीनच खालावली. त्यांना जवळच्या रुग्णालायात दाखल करण्यात आले असून तिथे त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, काही महिन्यांआधीच वडिल आणि धाकट्या मुलामध्ये जोरदार वाद झाला होता ज्याला पोलिस ठाण्यात मिटवण्यात आले. हत्येनंतर आरोपी पळून गेला नाही तर तो आपल्या खोलित जाऊन बसला जिथून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. घटनेत मृत पावलेल्या तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून पोलिस घटनेचा सखोल तपास करत आहेत.