संग्रहित फोटो
छत्रपती संभाजीनगर : रॅप साँग कोण चांगले म्हणतो, या कारणावरून झालेल्या वादातून राजीवनगर रेल्वे स्टेशन परिसरात १० जणांच्या टोळक्याने एका तरुणाचा चाकू, वीट, सिमेंटचा गट्टा तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून खून केला आहे. त्याच्या मामेभावावरही चाकूने हल्ला करण्यात आला. ही घटना शनिवारी रात्री ११ ते रविवारी मध्यरात्री १२.४५ वाजेदरम्यान घडली आहे. गुन्हा उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी सहा तासांत नऊ आरोपींना अटक केली, तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
शेखर उर्फ पिया देवीदास लहाने (२०, रा. इटखेडा) असे मृत तरुणाचे, तर श्रीजत राजू आदमाने असे जखमीचे नाव आहे. मंगेश गायकवाड, अजय उर्फ कमलेश भुतकर, अविनाश बोर्डे, संतोष जाधव, इम्रान पठाण, अनिरुद्ध आराख, रोहित गायकवाड, दीपक हिवाळे, मंगेश उगले यांच्यासह एकावर गुन्हा दाखल केला. शेखर उर्फ पिया देवीदास लहाने (वय २०) असे मृताचे तर श्रीजत राजू आदमाने (२०, दोघे रा. इटखेडा) असे गंभीर जखमी तरुणाचे नाव आहे.
शेखर, श्रीजत आणि त्यांचा मित्र प्रथमेश उर्फ बटी जंगले हे मुंबईहून आलेल्या मित्राला भेटण्यासाठी राजीवनगर येथे गेले होते. तेथे मंगेश गायकवाडने त्यांची इतर आरोपींशी ओळख करून दिली. त्यानंतर सर्वजण अनिरुद्ध आराख यांच्या राजुनगर येथील रिकाम्या घरात मद्यपानासाठी बसले. याचवेळी रॅप साँगवरून श्रीजत आणि अनिरुद्ध यांच्यात वाद झाला. मद्यपान सुरू असतानाच रॅप साँग कोण चांगले म्हणतो, यावरून श्रीजत आदमाने आणि अनिरुद्ध आराख यांच्यात वाद झाला. त्यानंतर सर्वजण भांडतच घराबाहेर पडले आणि राजीवनगर रेल्वे पुलाखाली रस्त्यावर आले.
शेखरचा मृतदेह पाहून प्रथमेश जंगले भीतीने पळाला
त्यानंतर इम्रान पठाण याने कमरेला लावलेला चाकू काढून, तुम हमारे इधर आकर ज्यादा मस्ती कर रहे हो क्या, अब तुमको खल्लास करता हूं, अशी धमकी देत श्रीजतवर वार केला. त्याने हात आडवा केल्याने दोन्ही हातांना गंभीर दुखापत झाली. पावसामुळे तो खाली पडताच मंगेश गायकवाड, अजय भुतकर, अविनाश बोर्डे व संतोष जाधव यांनी हातातील कडे, लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. श्रीजतला वाचविण्यासाठी धावलेल्या शेखरवर आरोपींनी हल्ला चढविला. अविनाश बोर्डे याने चाकूने वार केला, तर मंगेश गायकवाड व अजय भुतकर यांनी वीट आणि सिमेंटच्या गट्टयाने डोक्यावर प्रहार केले. इतर आरोपींनीही मारहाण केल्याने शेखर रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. प्रथमेश जंगले भीतीने तेथून पळून गेला.
शेखरचा मृत्यू; गुन्हा दाखल
घाबरलेल्या श्रीजतने घटनास्थळावरून पळ काढला. रविवारी सकाळी शेखरचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर तो नातेवाईकांसह वेदांतनगर ठाण्यात पोहोचला. गंभीर जखमी अवस्थेत घाटी रुग्णालयात दाखल केलेल्या शेखरचा पहाटे २.५५ वाजता मृत्यू झाला.






