
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
अकोला शहरातील मोठी उमरी परिसरातील संजय नगर आज घडली. आज सकाळी अचानक नितेश जंजाळ हा घराबाहेर आला आणि जोरजोराने आरडाओरड करू लागला. पीडित तरुण हा खाली पडला असून तो मरण पावला आहे असे सांगत त्याने परिसरातील नागरिकांना घटनास्थळी जमा केले. त्यामुळे परिसरात मोठी गर्दी झाली.
या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच सिव्हिल लाईन पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घराची तपासणी केली असता पीडित तरुणाच्या अंगावर गंभीर जखमा आढळून आले. डोक्यावर आणि तोंडावर जबर मारहाण झाल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांना हत्या झाल्याचे संशय आला. पोलिसांनी नितेश जंजाळची चौकशी सुरू केली. तेव्हा तपासादरम्यान, त्यानेच हत्या केल्याची बाब उघडकीस आली.
का केली हत्या?
मिळालेल्या माहितीनुसार, मृतक आणि नितेश जंजाळ हे दोघेही मागील तीन वर्षांपासून एकत्र राहत होते. सुरुवातीला चांगली मैत्री होती. नंतर ही मैत्री पुढे समलिंगी रिलेशनशिपमध्ये बदलली. सगळं सुरळीत सुरु होते. मात्र काही दिवसांपासून या दोघात सातत्याने वाद होत होते. मृतक हा इतर कोणाशी तरी संबंध ठेवत असल्याचा संशय आरोपी नितेशला होता. संशयावरून दोघांमध्ये भांडणे होत असल्याची माहिती परिसरातील नागरिकांकडून समोर आली आहे.
आरोपी अटकेत
काल रात्रीही याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. रात्री उशिरा नितेशने बाहेरून जेवण आणल्यानंतर हा वाद अधिक वाढला आणि त्यातूनच नितेशने हत्या केल्याची घटना घडली असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी आरोपीला नितेश जंजाळ याला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सिव्हिल लाईन पोलीस करत आहेत.
Ans: अकोला शहरातील मोठी उमरी परिसरात, रात्री उशिरा ही घटना घडली.
Ans: दोघे मागील तीन वर्षांपासून एकत्र राहत होते आणि समलिंगी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते.
Ans: नात्यातील संशय आणि सततच्या वादातून मारहाण झाली आणि त्यातूनच हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.