(फोटो सौजन्य: X)
व्हेल माशाची ‘उलटी’ घेऊन जात होते चौघे; तस्करीचा पर्दाफाश, २ कोटी ४६ लाखांचा मुद्देमाल जप्त
दोन संशयितांना गुन्हा दाखल
मनजीत काैरची आई कांता देवी यांच्या तक्रारीच्या आधारावर चंदीगड पोलिसांनी शुबी आणि पिंडा या दोन संशयितांवर अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ही घटना ३ जुलैच्या रात्री घडून आली. तक्रारीत म्हटले आहे की, दोन्ही आरोपींनी मनजीत काैरला सेक्टर-३४ येथील एका दारुच्या दुकानाजवळ भेटण्यासाठी बोलावले होते. तिथे पोहचल्यानंतर कथितरित्या दोन्ही आरोपींनी तिला जबरदस्तीने गाडीत बसवले आणि तिला घेऊन ते मोरिंडाला निघून गेले. इथे पोहचल्यानंतर त्यांनी मनजीतला बेदम मारहाण केली. यानंतर एका झाडाला बांधून तिला पेटवण्यात आले. माहिती आहे की, एका अनोळखी व्यक्तीने आग पाहिल्यानंंतर त्याने ब्लँकेटने ही आग विझवली ज्यामुळे मनमीतचा जीव यातून बचावला होता. तिला मोरिंडा येथील स्थानिक रुग्णालयात तातडीने भरती केले, जिथे तिची प्रकृती अत्यंत गंभीर होती. पुढे ९ जुलै रोजी तिला पीजीआयएमईआर (चंदीगड) येथे पाठवण्यात आले.
उपचारादरम्यान मृत्यू
PGIMER मध्ये मनजात अनेक दिवस बेशुद्ध अवस्थेत होती, ५ ऑगस्ट रोजी थोड्या वेळासाठी ती शुद्धीवर आली ज्यानंतर तिने घडलेला सर्व प्रकार कुटुंबाला सांगितला. तथापि, यानंतर तिची प्रकृती पुन्हा खालावली आणि गंभीररित्या भाजल्याने २६ ऑगस्ट रोजी रुग्णालयातच तिचा मृत्यू झाला.
रेल्वेसमोर उडी घेऊन पोलिस उपनिरीक्षकाची आत्महत्या; पोलिस गणवेशातच उचललं टोकाचं पाऊल
आरोपींचा शोध सुरु
मनजीतच्या मृत्यूनंतर सेक्टर-३४ पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम १४०(१) (अपहरण), १०३(१) (खून) आणि ३(५) (सामायिक गुन्हेगारी जबाबदारी) अंतर्गत FIR दाखल करण्यात आली आहे. पोलसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनजीतचा घटस्फोट झाला होता आणि तिला सात वर्षांचा मुलगा आहे. पोलीस सूत्रांनुसार, मनजीत आरोपींपैकी एकासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होती. तथापि याची स्पष्टता अद्याप झाली नाही. पोलिसांनी संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला असून शुबी आणि पिंडा यांना शोधण्यासाठी पोलिस अनेक ठिकाणी छापे टाकत आहे. याशिवाय मनजीतच्या कुटुंबाची आणि तिच्या मित्रमंडळींची चाैकशी करुन पोलिस घटनेसंबंधित पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करत आहे.






