
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
मंदाबाई सुरेश अंगारखे (वय 45, रा. गांगलवाडी, नारळा, ता. पैठण) असे हत्या झालेल्या महिलेने नाव आहे. तर आरोपीचे नाव सुरेश अंगारखे असे आहे.
सुरेश आणि मंदाबाई हे बुधवारी सकाळी संत ज्ञानेश्वर उद्यान परिसरातील झाडझुडपांनी वेढलेल्या भागात सरपणासाठी लाकडे गोळा करण्यासाठी गेले होते. यावेळी सुरेशने सोबत आणलेल्या कुऱ्हाडीने पत्नीच्या डोक्यावर आणि शरीरावर सलग तीन वार केले. या हल्ल्यात मंदाबाई रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मी माझ्या बायकोला कायमचे संपविले…
हत्या केल्यांनतर आरोपी पोलीस ठाण्यात गेला आणि तिथे त्याने “मी माझ्या बायकोला कायमचे संपविले,” असे सांगत गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून हत्येसाठी वापरण्यात आलेली कुऱ्हाडी पोलिसांनी जप्त केली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पैठण येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. मात्र त्याने हत्या का केली? याचा तपास पोलीस करत आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाला आहे.
पत्नीवर संशय, निर्जन जंगलात नेलं आणि…; दोन लहान मुलांनी गावात धाव घेत सांगितला थरार
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अधिक महिना सुरु असल्याने धोंडे जेवण सासरवाडीत सांगितले जाते. असेच धोंडे जेवण करून जात असतांना एका विवाहितेची तिच्याच पतीने गळा आवळून हत्या केल्याचे समोर आले आहे. हा सगळं प्रकार त्याने आपल्या लहान मुलांसमोर केले. कन्नड तालुक्यातील ठाकरवाडी परिसरात ही भयंकर घटना उघडकीस आली आहे.
आधी प्रेमविवाह केला अन् नंतर हुंड्यासाठी छळ झाला; अखेर नवविवाहितेची विष प्राशन करून आत्महत्या
Ans: औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील कळंकी घाट परिसरात ही घटना घडली.
Ans: पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतल्यामुळे ही हत्या झाल्याचे समोर आले आहे.
Ans: आरोपी पती दगडू मधे याने थेट पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले.