
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
तेलंगणा राज्यातील एक नव दाम्पत्य तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन हैदराबादकडे परत जात होते. यावेळी सोलापूर–हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर उमरगा चौकाजवळील भारत टायर दुकानासमोर मारुती सुझुकी कार (क्रमांक टीएस 34 एफ 4706 / ) भरधाव वेगाने जात असताना अचानक उजव्या बाजूचे टायर फुटले. त्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि कर रस्त्याच्या कडेला असलेल्या चहाच्या स्टॉलमध्ये घुसली.
त्यावेळी स्टॉलवर माजी नगरसेवक बळीराम कृष्णा पवार (वय 48),तथा जनता अर्थमूवर्सचे मालक लाडनशा गुलाबशा मुर्शीद (वय 52) आणि मेकॅनिक सचिन भिमाशंकर कुटार (30)हे चहा पित बसले होते. त्यावेळी अचानक कार घुसल्याने बळीराम पवार व लाडनशा मुर्शीद यांचा जागीच मृत्यू झाला, तर यात सचिन कुटार गंभीर जखमी झाले. तसेच टपरीचालक महादेव देढे यांनाही दुखापत झाली आहे.
अपघातामुळे तीन दुकानांचे नुकसान
या भीषण अपघातात चहाच्या टपरीसह परिसरातील तीन दुकानांचेही मोठे नुकसान झाले आहे. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी जखमींना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. पुढील तपास सुरु आहे.
कला केंद्रावर सशस्त्र दरोडा; 9 लाखांचा सोनं लंपास, डोक्याला पिस्तूल लावून धमकी
येरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या परिसरामध्ये राहणाऱ्या निर्मला जाधव या कलाकेंद्र चालवून आपल्या पोटाची गुजरात करतात. त्यांचं बार्शी रोड वरती एक स्वतःचे कला केंद्र आहे मात्र पहाटेच्या सुमारास सशस्त्र दरोडा घालून घरातील जवळपास सहा लाख रुपयांचा सोन लंपास केल्याची घटना घडली आहे. ही घटना घडताना आरोपींनी डोक्याला थेट पिस्तूल लावली आणि डोळ्यात मिरचीची पूड टाकण्याची धमकी दिली. पहाटेच्या सुमारास घरात येऊन दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला आणि निर्मला जाधव यांच्या घरातील एकूण मुद्देमाल जवळपास नऊ लाख 51 हजार रुपयांचा सोनंलंपास केलं. या प्रकरणात आता येरमाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. निर्मला जाधव या धाराशिव साखर कारखान्याच्या जवळ क्रमांक 12 मध्ये कला केंद्राच्या दुसऱ्या मजल्यावर राहतात. त्यांच्यासोबत लहानपणापासूनची त्यांची मैत्रीण रेखा शिंदे (रा. टाकळी जिल्हा परभणी) व शिवम उर्फ गळ्या गंगावणे हे एकत्र राहत होते.
Ans: धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहराजवळ सोलापूर–हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर जकेकूर चौक परिसरात.
Ans: भरधाव कारचे उजव्या बाजूचे टायर अचानक फुटल्याने चालकाचा ताबा सुटला आणि कार चहाच्या टपरीत घुसली.
Ans: या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत.