
crime (फोटो सौजन्य: social media)
काय नेमकं प्रकरण?
मृतक हिपती आंबाजी सुरवसे यांना दोन बायका होत्या. पहिली पत्नी मरण पावल्यानंतर त्यांनी दुसरे लग्न केले हो पहिल्या पत्नीपासून त्यांना दोन मुले आहेत. तर दुसऱ्या पत्नीपासून एक मुलगी आहे. भविष्यात आणखी मुले झाल्यास आमच्या वाट्याची संपत्ती विभागली जाईल या भीतीने पहिल्या पत्नीची दोन्ही मुलं वडिलांकडे सावत्र आईचे कुटुंबनियोजन करण्याची वारंवार मागणी करत होती. मात्र, पित्याने याकडे दुर्लक्ष केल्याने घरात सतत वाद होत होते.
वडील शेतात झोपले असतांना…
शुक्रवारी दुपारी वडील आपल्या शेतात गेले होते. हीच संधी साधत 17 वर्षीय अल्पवयीन मुलगा त्यांच्या मागावर शेतात पोहोचला. शेतात काम करून वडील गाढ झोपलेले असल्याचे पाहून रागाच्या भरात बाजूला पडलेला मोठा दगड उचलून त्याने थेट वडिलांच्या डोक्यात घातला. हा प्रहार इतका भीषण होता की महिपती सुरवसे रक्ताच्या थारोळ्यात पडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
वडिलांची हत्या केल्यानंतर आरोपी मुलाने कोणताही थरकाप न दाखवता मोटरसायकल काढली आणि तो नळदुर्ग शहरात आला. तेथील एका हॉटेलमध्ये पोटभर जेवण केलं. त्यानंतर थेट तो नळदुर्ग पोलीस ठाण्यात हजर झाला. तिथे त्याने हत्येची कबुली दिली. ‘मी माझ्या वडिलांचा खून केला आहे, मला अटक करा’ अशी कबुली त्याने पोलिसांपुढे दिली.
पोलिसांनी त्याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 103(1) अन्वये हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला बाल न्याय अधिनियम 2015 अंतर्गत पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला धाराशिव येथील बाल न्यायालयात हजर करण्यात आले आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहे. या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.
Ans: तुळजापूर तालुक्यातील अणदूर शिवारातील चिकणी तांडा येथे १६ जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास.
Ans: सावत्र आईला पुढे मूल झाल्यास संपत्तीत वाटा कमी होईल या भीतीतून कुटुंबनियोजनावरून वाद सुरू होते.
Ans: आरोपी अल्पवयीन असल्याने बाल न्याय अधिनियम 2015 अंतर्गत कारवाई करत बाल न्यायालयात हजर करण्यात आले आहे.