Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सायबर चोरट्यांकडून नवीन युक्त्यांचा वापर; दररोज तब्बल ‘इतक्या’ जणांना गंडा

आपल्या देशात दर तासाला ३३० लोक, दर मिनिटाला सुमारे ५.५ लोक आणि दर ११ सेकंदाला कोणी ना कोणी डिजिटल फसवणुकीचे बळी पडत आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 25, 2025 | 01:49 PM
सायबर चोरट्यांकडून नवीन युक्त्यांचा वापर; दररोज तब्बल 'इतक्या' जणांना गंडा

सायबर चोरट्यांकडून नवीन युक्त्यांचा वापर; दररोज तब्बल 'इतक्या' जणांना गंडा

Follow Us
Close
Follow Us:

सायबर फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहण्यासाठी रेडिओ, फोन, सोशल मीडिया आणि टेलिव्हिजन चॅनेलवर रात्रंदिवस प्रचार केला जात असला तरी, देशात सायबर फसवणुकीचे प्रकार थांबत नाहीत. अलिकडेच अर्थ मंत्रालयाने राज्यसभेत सादर केलेल्या सायबर फसवणुकीच्या आकडेवारीनुसार गेल्या १० महिन्यात म्हणजे एप्रिल २०२४ ते जानेवारी २०२५ पर्यंत फसवणुकीच्या २४ लाख घटना नोंदविल्या गेल्या आहेत. ज्यामध्ये फसवणूक करणाऱ्यांनी लोकांकडून ४२४५ कोटी रूपये लुटले आहेत.

जर आपण या दृष्टिकोनातून पाहिले तर, गृहमंत्रालयाकडून सायबर फसवणुकीविरूद्ध युद्धपातळीवर जागरूकता मोहीम राबविली जात असूनही, सायबर घोटाळेबाजांचे मनोबल उंचावलेले आहे, त्यामुळे इतकी प्रसिद्धी होऊनही डिजीटल फसवणुकीचे प्रकार पूर्णपणे थांबलेले दिसून येत नाहीत. या घटना थोड्यासुद्धा कमी झालेल्या नाहीत, उलट त्या सतत वाढत आहेत. २०२२-२३ या संपूर्ण वर्षात सायबर फसवणुकीच्या एकूण २० लाख घटनांची नोंद झाली होती, तर २०२३-२४ मध्ये या घटनांची संख्या वाढून ती २८ लाख झालेली आहे. २०२२-२३ मध्ये एकूण २५३७ कोटी रूपयांची फसवणूक झाली होती, तर २०२३-२४ मध्ये फसवणुकीचा आकडा ४४०३ कोटी रूपयांवर पोहचला आहे. यावर्षी १० महिने उलटले आहेत आणि गुन्हेगारांनी केलेली फसवणूक ४२४५ कोटी रूपयांवर पोहचली आहे. जी २०२२-२३ च्या तुलनेत ६७ टक्के जास्त आहे. यावरून असा अंदाज लावता येतो की, गृह मंत्रालयाने अलिकडेच स्थापन केलेल्या सायबर सेलच्या कारवाया होऊनही गुन्हेगारांना भीती वाटत नाही.

डिजीटल पेमेंट फसवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने सेंट्रल पेमेंट्स फ्रॉड इन्फॉर्मेशन रजिस्ट्री सुरू केली आहे. येथे तत्काळ तक्रार करून फसवणूक करणाऱ्यांना पैसे काढण्यापासून रोखणे हा त्याचा उद्देश आहे. आतापर्यंत या प्रयत्नातून बँकिंग नेटवर्कने १३ लाख तक्रारींवर त्वरित कारवाई करून ४३८६ कोटी रूपये वाचविले आहेत. यावरून असा अंदाज लावता येतो की, पोलिस, तपास संस्था आणि बँकांच्या संयुक्त दक्षतेनंतरही फसवणूक करणाऱ्यांचा कहर खूपच जास्त असल्याचे सिद्ध होत आहे. या संदर्भात रिझर्व्ह बँक ‘म्यूल हंटर डॉट एआय’ या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विशेष साधनांची मदत घेत आहे. हे सर्व असूनही गुन्हेगारांचे मनोबल इतके उंचावले आहे की, ते सर्वांनाच मागे टाकत आहे. गेल्या काही महिन्यात नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने युपीआय व्यवहाराची सुरक्षा अनेक पातळ्यावर वाढविली आहे. कारण फसवणुकीच्या घटना कमी होण्याऐवजी सतत वाढत आहेत.

नवीन युक्त्यांचा वापर

परिस्थिती तर अशी आहे की, गेल्या एक वर्षात सायबर गुंडांनी त्यांच्या फसवणुकीच्या पद्धतीमध्ये हजारांपेक्षा अधिक नवीन पद्धती वापरल्या आहेत. यावरून सायबर गुन्हेगार किती निर्भयपणे त्यांच्या कारवाया करीत आहेत याची कल्पना करता येऊ शकते. आता प्रश्न असा आहे की, हे सर्व प्रयत्न करूनही सायबर फसवणुकीच्या घटना थांबण्याऐवजी का वाढत आहेत? खरं तर बँकिंग व्यवस्थेतील त्रुटीव्यतिरिक्त कितीतरी जास्त डिजिटल बैंकिंग सुविधा वापरणारे लोक वारंवार इशारे आणि स्पष्टीकरण देऊनही निष्काळजीपणापासून ते परावृत होत नाहीत.

डिजिटल अटकेच्या प्रकरणात मोठी वाढ

विविध अहवाल आणि डिजिटल अंदाज असे सूचित करतात की, अजूनही ऑनलाईन बँकिंग किंवा कोणत्याही प्रकारच्या व्यवहाराचा वापर करणारे ५० टक्क्यापेक्षा जास्त लोक फसवणूक होण्याच्या भीतीपासून मुक्त आहेत, त्यांना यासंबंधी काही जाणून घेण्याची किंवा समजून घेण्याची आवश्यकता सुद्धा वाटत नाही. रात्रंदिवस डिजिटल व्यवहार करणारे अनेक लोक ऑनलाईन सुरक्षेबाबत खूपच निष्काळजी असतात आणि सर्वकाही माहित असूनही फसवणुकीचे बळी ठरतात. मागील काही वर्षात या संदर्भात हजारो मार्गाने लोकांना सावध करण्यासाठी शक्य तितके सर्व प्रयत्न केले गेले आहेत. बहुतेक वेळा, लोक त्यांच्या फोनवर कॉल येण्यापूर्वीच त्रासदायक संदेश वारंवार ऐकतात, तथापि, सत्य असे आहे की, बहुतेक लोक ते एका कानाने ऐकतात आणि दुसऱ्या कानाने ते काढून टाकतात.

सतर्क राहण्याची गरज

फसवणूक करण्याचे तंत्र वारंवार बदलून ते पोलिस आणि तपास संस्थांना मुर्ख बनविण्यात यशस्वी होत आहेत. पण त्याहूनही महत्वाचे म्हणजे जेथे आपल्या देशातील लोक इतक्या मोठ्या प्रमाणात डिजिटल जीवनशैली जगतात, तेथे बहुतेक लोकांची डिजिटल साक्षरता ५० टक्केही नाही. साधारणपणे आपल्या देशातील लोकांना काहीही शिकण्याची सवयच नसते आणि डिजिटल साक्षरतेच्या बाबतीतही लोकांनी अशीच उदासीन वृती स्वीकारलेली आहे, त्यामुळे लोकांना या सर्व गोष्टींबद्दल थोडेही सावध राहण्याची गरज वाटत नाही. आपल्या देशात दर तासाला ३३० लोक, दर मिनिटाला सुमारे ५.५ लोक आणि दर ११ सेकंदाला कोणी ना कोणी डिजिटल फसवणुकीचे बळी पडत आहेत.

Web Title: Every day new cases of fraud by cyber thieves are being exposed nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2025 | 01:49 PM

Topics:  

  • Arrested
  • cyber crime
  • Froud News
  • india
  • maharashtra
  • Police News

संबंधित बातम्या

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी
1

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

Switzerland IACCC : भारतीयांचा ‘काळा पैसा’ परत मिळणार? स्वित्झर्लंडचा IACCC मध्ये सामील होण्याचा भविष्यदर्शी निर्णय
2

Switzerland IACCC : भारतीयांचा ‘काळा पैसा’ परत मिळणार? स्वित्झर्लंडचा IACCC मध्ये सामील होण्याचा भविष्यदर्शी निर्णय

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या
3

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…
4

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.