
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
गैरवर्तनाचा बदला घेण्यासाठी हत्येचा कट रचला. आधी महिलेच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम खाते उघडून अंकुशला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर त्याला भेटण्यासाठी फलटण येथे बोलावण्यात आले. १५ फेब्रुवारी रोजी अंकुश फलटण येथे भेटण्यासाठी गेला. संबंधित महिलेने त्याला एकांतात वेळ घालवण्याच्या बहाण्याने तातमगिरी डोंगराच्या पायथ्याशी नेले. त्याठिकाणी कटानुसार इतर चार आरोपी वेगवेगळ्या वाहनांतून आले. त्यांनी अंकुशला मारहाण करून वाहनात टाकले व पिंप्रद येथील निर्जनस्थळी नेले. तेथे त्याचा खून करून मृतदेह गोखळी हद्दीतील नीरा नदीत फेकून दिला.
पोलिसांना नीरा नदीपात्रात अंकुशचा मृतदेह आढळून आला. अंकुश नरबटच्या डोक्यावरील जखमांमुळे पोलिसांना संशय आला. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. हा खून अत्यंत थंड डोक्याने व नियोजनबद्ध पद्धतीने केल्यामुळे सुरुवातीला पोलिसांकडे कोणतेही ठोस धागेदोरे नव्हते. मात्र, पोलिसांनी फलटण ते दहिवडी मार्गावरील हॉटेल्स, दूध डेअरी व पेट्रोल पंप येथील सीसीटीव्ही फुटेज तपासले. आरोपी व मृतक यांच्या मोबाइल 3 क्रमांकांची तांत्रिक माहिती मिळवून त्याआधारे पुराव्यांची साखळी जोडत गुन्हा उघडकीस आणला.
चार आरोपींना अटक
पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली आहे. आविष्कार ज्ञानेश्वर भगत, श्रद्धा आविष्कार भगत, ज्ञानेश्वर भरतराव भगत, अर्चना ज्ञानेश्वर भगत (चौघे रा. पिंप्रद, ता. फलटण, जि. सातारा), अशी पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहे. पोलिस या घटनेचा तपास करत आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
Ans: फलटण तालुक्यातील तातमगिरी डोंगर परिसर व गोखळी हद्दीत.
Ans: सीसीटीव्ही फुटेज व मोबाईल तांत्रिक विश्लेषणातून पुरावे मिळाले.
Ans: एकाच कुटुंबातील चार आरोपींना अटक; पुढील तपास सुरू.