
“मानवी जीवनाशी खेळ चालणार नाही”; ५० खलाशांना मुक्त करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर कारचा भीषण अपघात, महिलेचा मृत्यू; जखमींचा आकडाही आला समोर
मानवी जीवनाशी असे वागणे सहन करणार नाही !
जहाजांच्या मालकांना मानवी जिवाचे मोल नसून त्यांना फक्त त्यांच्या जहाजाची आणि व्यावसायिक कामांची चिंता असल्याचे खडेबोल न्यायालयाने सुनावले. तसेच या कर्मचाऱ्यांना फक्त ३०० मिलीलिटर पाणी कसे देऊ शकता ? आपल्या घरातील पाळीव प्राण्यांनाही दररोज यापेक्षा जास्त पाणी मिळते. मानवी जीवनाशी असे वागणे आम्ही सहन करणार नाही. प्रत्येकाला आयुष्य एकदाच मिळते, असा पुनरुच्चारही न्यायालयाने केला. तसेच न्यायालय मानवी जीवांची काळजी घेईल, जहाजांचे मालक त्यांच्या ताब्यात घेतलेल्या जहाजांची काळजी करू शकतात, अशी टिपण्णी करून न्यायालयाने यलो गेट पोलिसांना ५० खलाशांसंदर्भातील सर्व कायदेशीर औपचारिकता पूर्ण करून त्यांना सोडण्याचे आदेश दिले.
याचिकेत काय ?
शहरापासून ११ सागरी मैल अंतरावर अरबी समुद्रात अवैध इंधन तेल आणि डांबराचे हस्तांतरण करताना यलो गेट पोलिसांनी तीन जहाजे ताब्यात घेतली होती.
एमटी अस्फाल्ट स्टार, एमटी स्टेलर रुबी आणि एमटी अल जाफझिया अशी तिन्ही जहाजांची नावे असून त्यावर ५० अधिक खलाशी अडकले आहेत.
या ५० खलाशांपैकी सात जणांनी हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली होती. फेब्रुवारी महिन्यापासून या जहाजांवर अडकले असून अत्यंत कमी अन्न आणि पाण्याच्या पुरवठ्यासह राहत असल्याचा दावा याचिकेत केला आहे.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)