
crime (फोटो सौजन्य: social media)
नेमकं प्रकरण काय?
या प्रकरणातील मुख्य आरोपी चे नाव उर्मिला उर्फ बिंदू असा आहे. ती कन्नड सिनेसृष्टीतील एक ओळखीचा चेहरा आहे. तिने बजरंगी, पोलीस कॉटर्स आणि कालभैरव यासारख्या प्रसिद्ध कन्नड चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारले आहेत. बिंदू ही मोहनराव नावाच्या तरुणांसोबत लिविन रिलेशनशिप मध्ये राहत होती. सगळं काही सुरळीत सुरू होतं. मात्र दरम्यान तिचे विनय नावाच्या दुसऱ्या एका तरुणासोबत प्रेम संबंध जोडले. या दोघांना लग्न देखील करायचे होते. पण या नात्यात लिविंग रिलेशनशिप मधला मोहनराव हा अडसर ठरत होता. याच अडथळ्याला दूर करण्यासाठी या दोघांनी भयंकर कट रचला.
पार्टी आणि कट
18 फेब्रुवारी 2026 रोजी बिंदू आणि मोहन ज्या घरात एकत्र राहत होते तिथे एक पार्टी आयोजन करण्यात आली. या पार्टीला विनय आणि त्याचा मित्र धनुष यांनाही बोलवण्यात आले होते. यावेळी पार्टीमध्ये उपस्थित असलेल्या सर्वांनी मध्य प्राशन केलं त्याचवेळी विनय आणि धनुषने मोहन राव वर हल्ला केला. त्यांनी मोहन वर चाकूने सपासप वार केले.
गंभीर जखमी झालेला मोहन हा ओरडू लागला. त्याचा आवाज बाहेर जाऊ नये म्हणून बिंदूने त्याच्या तोंडावर आणि नाकावर घट्ट टेप गुंडाळला. एवढेच नाही तर त्याचे हात पाय बांधून त्याला हतबल करण्यात आले. काही वेळातच गंभीर जखमा आणि गुदमरल्यामुळे मोहनने श्वास सोडला. त्याचा जागीच मृत्यू झाला.
हत्येनंतर फरार
त्यानंतर बिंदू मोहन आणि धनुषने घराला कुलूप लावले आणि तिथून फरार झाले. कोणालाही संशय येऊ नये म्हणून त्यांनी हे घर पूर्णपणे बंद ठेवले होते. मात्र १२ दिवसांनी परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरू लागली. शेजाऱ्यांनी या दुर्गंधी बाबत पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घराचा दरवाजा तोडला. तेव्हा त्यांना मोहनराव चा कुजलेला मृतदेह आढळून आला.
आरोपी अटकेत
पोलिसांनी या घटनेचा तपास केला. तपासात त्यांना अभिनेत्री बिंदू तिचा प्रियकर विनय आणि मित्र धनुष हे संशयित वाटले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले त्यांची चौकशी केली आणि त्यांना अटक केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या कटात आणखी कोणी सामील होतं का याचा शोध घेत आहे. या प्रकरणाने संपूर्ण कन्नड सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे.
15 लाखांची रोकड घेऊन निघालेल्या तरुणाचा पाठलाग, नागरिक जमा झाले अन्…; पुण्यातील थरारक घटना
Ans: बेंगळुरुतील मंजुनाथनगर परिसरात ही घटना घडली.
Ans: पार्टीच्या बहाण्याने बोलावून चाकूने हल्ला करून व तोंड-नाक टेपने बंद करून गुदमरवून हत्या करण्यात आली.
Ans: घर 12 दिवस बंद असल्याने दुर्गंधी पसरली, शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवल्यानंतर प्रकरण उघड झाले.