सौजन्य फोटो - सोशल मिडीया
Navi Mumbai Crime : एमआयडीसीत दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश; १५ व्यक्ती व संस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
आग लागल्याचे लक्षात येताच डॉक्टर, परिचारिका आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. विभागात उपचार घेत असलेल्या इतर नवजात बालकांना धुराच्या कोंडीतून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. या विभागात एकूण ३९ बालकांवर उपचार सुरू होते. त्यापैकी ३६ बालकांची सुटका करण्यात आली असून, काही बालकांना पुढील उपचारांसाठी इतर रुग्णालयांत हलविण्यात आले. सहा बालकांना सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
या दुर्घटनेनंतर रुग्णालय परिसरात पालक आणि नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळाला. काही कुटुंबांनी आपल्या चिमुकल्यांच्या मृत्यूबाबत संताप व्यक्त करत रुग्णालय प्रशासनाच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले. एका वडिलांनी, “बाळ गेल्याचं आईला कसं सांगू?” असा काळीज पिळवटून टाकणारा सवाल केला. बाळाच्या जन्मानंतर घरात आनंदाचे वातावरण असताना काही दिवसांतच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याची व्यथा त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, मृत बालकांच्या शवविच्छेदनावरूनही काही पालकांनी नाराजी व्यक्त केली. “आमचं बाळ जसं आहे तसं परत द्या,” अशी मागणी नातेवाईकांकडून करण्यात आली. त्यामुळे रुग्णालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
या घटनेची गंभीर दखल घेत प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे. आगीच्या कारणाचा शोध घेण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून तपास केला जात आहे. रुग्णालयाचे नियमित फायर ऑडिट झाले होते, असा दावा जिल्हा प्रशासनाने केला असून, सध्या तपासाचा केंद्रबिंदू आग लागण्यास कारणीभूत ठरलेल्या उपकरणावर आहे.
तीन नवजात बालकांच्या मृत्यूने अमरावती जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून, रुग्णालयांमधील अग्निसुरक्षा आणि आपत्कालीन व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.






