
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
या प्रकरणातील महिलेचे नाव आरती असे आहे. ती मूळची बिहारची रहिवासी आहे. पती मुन्ना आणि त्याची दुसरी पत्नी यांनी संगणमत करून आरतीला बेदम मारहाण केली. मारहाण सुरू असताना आरतीचे डोके जोरात भिंतीवर आपटण्यात आले, यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.
मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडली. बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या साईट सुपरवायझरला मुन्नाच्या हालचालींवर संशय आला. सुपरवायझर घटनास्थळी पोहोचला असता, त्याला आरती रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळली. तोपर्यंत आरोपी पती मुन्ना, त्याची दुसरी पत्नी मीरा आणि मुलांसह तिथून पसार झाला होता. हे सर्वजण मूळचे बिहारचे असल्याने ते तिथे पळून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आरोपी मुन्ना हा मूळचा बिहारचा असल्याने तो रेल्वेमार्गे पळून गेल्याचा संशय आहे. पोलिसांनी रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे.
पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच अर्नाळा-बोळींज पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून काही नमुने जमा केले आहेत. आरोपी मुन्ना आणि मीरा यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.
लग्नास नकाराचा राग; होणाऱ्या पतीने प्रियकराची केली हत्या, आरोपी 60 तासांत अटकेत
मुंबईच्या वांद्रे येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. महिलेने लग्न करण्यास नकार दिल्याने होणाऱ्या नवऱ्याने प्रियकराची हत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी अवघ्या ६० तासांत या प्रकरणाचा छडा लावला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना वांद्रे येथील खेरवाडी येथे घडली.
Ans: विरार पश्चिमेतील ग्लोबल सिटी परिसरातील कल्पवृक्ष कॉम्प्लेक्समध्ये.
Ans: मृत महिलेचा पती मुन्ना आणि त्याची दुसरी पत्नी मीरा यांच्यावर संशय आहे.
Ans: साइट सुपरवायझरला संशय आल्याने तो घटनास्थळी गेला आणि महिलेचा मृतदेह आढळून आला