पहिली घटना
पहिली घटना ही बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यात येणाऱ्या सोनाळा येथील आहे. २८ वर्षीय युवकाने लग्न होत नसल्याच्या नैराश्यातून आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवल्याची ह्रदयद्रावक घटना घडली. हरिष वानखडे (वय २८ वर्ष) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आईच. घरातील सर्व सदस्य आपल्या कामावर गेल्यांनतर त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. हरीश हा भमिहिन असून अत्यंत गरीब कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचे वडील मागील गेल्या 02 ते 03 वर्षापासुन त्याच्या लग्नासाठी मुलगी पाहत होते, परंतु गरीब परिस्थितीमुळे त्याला मुलगी द्यायला कुणी तयार होत नव्हते. याच नैराशातून त्याने आत्महत्या केल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दुसरी घटना
दुसरी घटना अंढेरा पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या चिखली तालुक्यातील मंगरूळ येथे घडली. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव सत्यपाल भिसे (२५ वर्ष) असे आहे. सत्यपाल ने लग्न जुळत नसल्याने व्यसनाधीन होऊन झाडाला गळफास घेऊन आपली हत्या केली. सत्यपाल सोबतच्या मित्राने लग्न झाले होते, शिक्षण भरपूर झाल्याने नोकरी मिळत नव्हती, शिवाय लग्न सुद्धा जुळत नव्हते, त्यामुळे त्याला दारूचे व्यसन सुद्धा लागले होते. या नैराश्यातून त्याने आत्महत्या केली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. दोन्ही प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आले असून तपास सुरु आहे.
संतापजनक! ७० वर्षीय नराधमाने अल्पवयीन मुलीवर केली अत्याचार; आरोपी अटकेत
बुलढाणा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ७० वर्षीय नराधमाने १२ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून कठोर शिक्षा करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या घटनेने बुलढाण्यात खळबळ उडाली आहे.
Ans: बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा आणि चिखली तालुक्यातील मंगरूळ येथे.
Ans: लग्न न जुळणे, आर्थिक अडचणी, बेरोजगारी आणि मानसिक नैराश्य.
Ans: दोन्ही प्रकरणांत आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू आहे.






