
crime (फोटो सौजन्य: social media)
पोलिसांना काय मिळाला रेव्ह पार्टीत
मिळालेल्या माहितीनुसार, तुळापूर येथील शिवसंस्कृती बंगल्यात ही रेव पार्टी सुरू होती. पार्टीमध्ये अनेक तरुण-तरुणी मद्याच्या नशेत बेभान झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. विशेष म्हणजे, या पार्टीत जवळपास ४९ तरुणी सहभागी असल्याची माहितीही समोर आली आहे. पोलिसांना या ठिकाणी छापा टाकल्यानंतर मोठ्या प्रमाणात विदेशी मद्यसाठा, गांजा आणि दोन हुक्का पॉट आढळून आले.
दारूची एक बॉटल ६५ हजार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या दारूसाठ्याची किंमत साडेनऊ लाख रुपयांच्या घरात आहे. काही विदेशी मद्याच्या बाटल्यांची किंमत ६५ ते ७० हजार रुपये असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय, पार्टीमध्ये वापरण्यात येणारा सुमारे एक कोटी रुपयांचा डीजे सेटअपही पोलिसांना आढळून आला. घटनास्थळावरून सुमारे ४ ग्रॅम गांजाही जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणात पोलिसांनी २९ जणांची रक्त चाचणी केली असून, अहवाल पॉझिटिव्ह आल्यास संबंधितांविरोधात पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, पार्टीत १५६ जण सहभागी असताना केवळ ७८ जणांवरच गुन्हे दाखल करण्यात आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
सुषमा अंधारेंनी उपस्थित केले प्रश्न चिन्ह
याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जर पार्टीत १५६ जण सहभागी होते, तर गुन्हे फक्त ७८ जणांवरच का दाखल करण्यात आले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच, संभाजी महाराजांच्या स्पर्शाने पावन झालेल्या तुळापूरमध्ये अशा प्रकारच्या पार्ट्या होणे दुर्दैवी असल्याची टीकाही त्यांनी केली.
पोलीस आयुक्तांचा कठोर कारवाईचा इशारा
या संपूर्ण प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी जवळपास ३० जणांना नोटिसा बजावल्या असून, त्यांना लोणीकंद पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणात कठोर कारवाईचा इशारा दिला असून, पुढील तपास सुरू आहे.
Parali Crime : तु माझ्याबरोबर पळून चल, नाहीतर मी…; परळीतील संतापजनक प्रकार
Ans: पुण्याजवळील तुळापूर येथील शिवसंस्कृती बंगल्यावर कारवाई करण्यात आली.
Ans: मोठ्या प्रमाणात मद्यसाठा, गांजा, हुक्का पॉट आणि महागडा डीजे सेटअप आढळला.
Ans: पार्टीत १५६ जण सहभागी असताना गुन्हे फक्त ७८ जणांवरच का दाखल करण्यात आले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.