
crime (फोटो सौजन्य: social media)
काय नेमकं प्रकरण?
रामनगरला राहणार चेतन आप्पासाहेब तांदळे (१८ वर्षीय) रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. शुक्रवारी रात्री चेतन आणि मित्र हर्षवर्धन गायकवाड हे दोघेजण वरद कॉलनी शामरावनगर येथे दाबेली खाण्यासाठी थांबले होते. तेव्हा सुजल आणि विनोद डांगे तिथे दुचाकीवरून आले. सुजल हा सतत जॅकेटमध्ये हात घालत होता. त्यामुळे चेतन याने त्याच्याजवळ जाऊन जॅकेट चाचपले. तेव्हा कमरेला चाकू असल्याचे आढळले. ‘चाकू घेऊन का फिरतोस?’ म्हणून चेतन याने त्याच्या कानाखाली चापट मारली. तेव्हा सुजल व विनोद तेथून निघून गेले.
चेतन व हर्षवर्धन दुचाकीवरून जात असताना सुजलचा भाऊ शुभम याने त्याला थांबवले. तू सुजलला का मारलेस म्हणून जाब विचारला. दोघांमध्ये वाद सुरू असताना सुजल, मामा विनोद, राहुल जाधव तेथे आले. त्यांनी चेतनवर चाकूने वार करण्यास सुरुवात केली. गर्दी जमल्यानंतर चौघेजण दुचाकीवरून पळाले, चेतनच्या गळ्यात घुसलेला चाकू तसाच होता. डोक्यात, पोटावर, गळ्यात खोलवर वार झाल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.
पोलीस घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवला आहे. सुजल उर्फ पाप्या वाघमोडे, भाऊ शुभम वाघमोडे, राहुल जाधव, सुजलचा मामा विनोद डांगे यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी विनोद डांगे याला ताब्यात घेण्यात आले असून पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहे.
Ans: किरकोळ वादात चापट मारल्याचा राग अनावर झाल्याने हत्या करण्यात आली.
Ans: एकूण चार जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल आहे.
Ans: चाकूने गळा, डोके व पोटावर वार करून निर्घृण हत्या केली.