
ही कसली क्रूरता? भटक्या कुत्र्याला पकडले, हवेत गरगर फिरवले अन्...; PCMC मधील Video Viral
पिंपरी-चिंचवड शहरात मानवतेला काळिमा फासणारी धक्कादायक घटना
भटक्या कुत्र्याला काही तरुणांनी केली अमानुष मारहाण
घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आले समोर
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात मानवतेला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपरी-चिंचवड येथील संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २८ फेब्रुवारीच्या मध्यरात्री एका भटक्या कुत्र्याला काही तरुणांनी अमानुष मारहाण केल्याची घटना घडली. रात्री सुमारे एक वाजण्याच्या सुमारास आरोपी स्वप्निल सखाराम सावंत याने रस्त्यावर उभ्या असलेल्या कुत्र्याला पाठीमागून पकडून हवेत फिरवत जोरात जमिनीवर आपटल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे.
या मारहाणीत कुत्रा गंभीर जखमी झाला. त्यानंतर आरोपी आणि त्याच्या सोबत असलेल्या सहा ते सात जणांनी भर रस्त्यात आरडाओरडा करत धिंगाणा घातल्याचेही समोर आले आहे. एवढ्यावरच न थांबता, संबंधितांनी चारचाकी वाहनाने जखमी कुत्र्याला उडवण्याचाही प्रयत्न केल्याची माहिती आहे. सुदैवाने कुत्रा थोडक्यात बचावला.
ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होताच नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. एका तरुणाने पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून इतर सहभागींची ओळख पटवली जात आहे. आरोपींवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.
Nashik News: धक्कादायक! मुले-मुली बेपत्ता होण्याच्या संख्येत वाढ, आकडेवारी काय सांगते?
मुले-मुली बेपत्ता होण्याच्या संख्येत वाढ
सटाणा शहरात घर सोडून पळून जाण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाह होत असल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षभरात सटाणा पोलीस ठाण्यात अल्पवयीन ५४ मुलामुली बेपत्ता झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी ५२ जणांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. तसेच १५९ प्रौढ स्त्री-पुरुषांनी घर सोडल्याच्या तक्रारी नोंद झाल्या असून १२५ जणांना शोधण्यात यश आले आहे. अद्याप ३४ प्रौढ व २ अल्पवयीन व्यक्ती बेपत्ता आहेत. या घटनांमुळे पालकांच्या डोक्यावर चिंतेचे ढग दाटतांना दिसत आहेत.
मुलांच्या लग्नाबाबत पालक अनेक अपेक्षा आणि स्वप्ने रंगवत असतात. चांगले कुटुंब, सुसंस्कृत जोडीदार आणि स्थिर आयुष्य यासाठी ते आयुष्यभर कष्ट करतात. मात्र लग्नाच्या उंबरठ्यावर असलेली मुलगी किंवा मुलगा अचानक घर सोडून परिचित व्यक्तीसोबत निघून गेल्याची घटना घडली की कुटुंबीयांना मोठा मानसिक धक्का बसतो. आजच्या डिजिटल युगात मोबाईल फोन, सोशल मिडिया आणि विविध चॅटिंग अॅप्समुळे ओळखी सहज जुळतात. अनेकदा या ओळखी आकर्षणातून भावनिक गुंतवणुकीत बदलतात आणि शेवटी घर सोडण्याचा निर्णय घेतला जातो. दिखाऊ जीवनशैलीचे आकर्षण, आर्थिक स्वावलंबनाची अपुरी समज, पालकांशी संवादाचा अभाव आणि भावनिक असुरक्षितता ही कारणे तरुणांना भरकटवतात. काही प्रकरणांमध्ये फसवणूक, ब्लॅकमेलिंग किंवा मानवी तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यांचा धोका देखील वाढतो.