
हनिमूनला पतीची हत्या; जामीन मिळताच सोनम रघुवंशीने तोडले मौन, म्हणाली, नेपाळला...
सोनम जामीनावर बाहेर आल्यानंतर राजाचा मोठा भाऊ विपिन रघुवंशी याने आरोप लावला की, सशर्त जामिनावर बाहेर असलेली सोनम पोलिसांना चकमा देऊन नेपाळला पळून गेली आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सीबीआयने करावी. यावर सोनमने आपली प्रतिक्रिया देत हे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. माध्यमांशी बोलताना सोनमने म्हटले की, नेपाळला पळून जाण्याची बातमी पूर्णपणे खोटी आहे. लोकांनी या अफवांवर विश्वास ठेवू नये असेही तिने सांगितले. सोनमला ती इंदूरला कधी जाणार असा प्रश्न विचारताच तिने स्पष्टपणे नकार दिला. सोनमने युक्तिवाद केला की, जिल्हा न्यायालयाने घालून दिलेल्या जामिनाच्या अटींचे ती पूर्णपणे पालन करत आहे आणि ती लगेच इंदूरला परत येणार नाही.
प्रसारमाध्यमांशी बोलताना सोनमने असेही सांगितले की, ती सध्या मेघालयची राजधानी शिलाँग इथे राहून न्यायालयाच्या मार्गदर्शन तत्वांचे पालन करेल. तथापि, शिलाँगमध्ये ती कुठे राहत आहे आणि तिचा खर्च कसा भागत आहे यावर तिने माैन धरले. तिने सांगितले की, सुरक्षेच्या कारणास्तव ती आपल्या राहण्याचे नेमके ठिकाण सांगू शकत नाही आणि खर्चाचा मुद्दा तिचा वैयक्तिक आहे.
हे लक्षात घेतले पाहिजे की, राजा रघुवंशी हत्याकांडात न्यायालयाने पोलिसांच्या तांत्रिक चुका आणि त्रुटींचा फायदा घेत सोनमला सशर्त जामीन मंजूर केला. यानंतर मेघालय पोलिसांनी या जामीनाला हाय कोर्टात आव्हान दिले आहे. पोलिसांनी कोर्टात याचिका दाखल केली असून सोनमचा जामीन रद्द करुन तिला पुिन्हा कोठडीत पाठवण्याची मागणी यात करण्यात आली आहे. या प्रकरणात प्रदीर्घ सुनावणीनंतर, न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे.
सासवड येथे वकिलाची केली गेली फसवणूक; भागीदारीत जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय सुरु करून…
दुसरीकडे, मृत राजा रघुवंशी याचा मोठा भाऊ विपिन रघुवंशी याने या हाय प्रोफाईल मर्डर केसची CBI चाैकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. विपिनचे युक्तिवाद आहे की, जर मुलींसंबंधित प्रकरणांमध्ये सीबीआय चाैकशीला तत्काळ मंजूरी मिळू शकते तर मुलाच्या हत्या प्रकरणात असं का घडत नाही? दरम्यान हे प्रकरण दोन राज्यांशी जोडले गेल्याने निष्पक्ष न्यायासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचा हस्तक्षेप फार महत्त्वाचा आहे.