
crime (फोटो सौजन्य: social media)
मानसिक छळाला कंटाळून पोलिसाची आत्महत्या; पत्नीसह प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल
काय नेमकं प्रकरण?
या प्रकरणातील आरोपीचे नाव अमित गुप्ता असे आहे. त्याने चार वर्षांपूर्वी २०२२ मध्ये प्रीती नावाच्या तरुणीसोबत प्रेमविवाह केला होता. सुरुवातीला सर्व काही सुरळीत होते, मात्र कालांतराने नात्यात दुरावा वाढत गेला. लग्नानंतरही दोघांमधील वाद मिटला नाही. प्रीती आणि आरोपी अमितला एक मुलगा आहे. वाद होत असल्याने प्रीती आपल्या माहेरी येऊन राहत होती. रात्री आरोपी अमित अचानक सासरी पोहोचला. तो थेट खोलीत शिरला आणि पत्नीकडून मुलाला हिसकावून घेण्याचा प्रयत्न करू लागला. याला प्रितीने विरोध केला तेव्हा अमित संतापला. त्याने थेट तिच्यावर चाकूने हल्ला केला. आरडाओरडा ऐकून जेव्हा सासू आणि सासरे वाचवण्यासाठी आले, तेव्हा आरोपीने त्यांच्यावरही हल्ला केला. या हल्ल्यात प्रीती आणि सासू सुशीला देवी यांचा जागीच मृत्यू झाला, तर सासरे अंतू गुप्ता गंभीर जखमी झाले. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
या प्रकरणाची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि पंचनामा केला. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्ट मार्टमसाठी पाठवले आहेत. यात गंभीर जखमी झालेले सासरे यांच्यावर वाराणसी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे. लग्नानंतर अमित प्रीतीला आपल्या घरी न नेता दुसरीकडे घेऊन गेला होता आणि तिला मारहाण केली होती, असा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे.
Vasai Accident: वसईत भरधाव ट्रकखाली पादचाऱ्याचा मृत्यू; अपघातानंतर नागरिकांचा संताप
Ans: उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात.
Ans: प्रेमविवाहानंतर वाढलेल्या कौटुंबिक वादातून हल्ला झाला.
Ans: मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे.