
कलिंगड खाल्ल्यानंतर कुटुंबाची प्रकृती बिघडली; चिमुकल्याचा मृत्यू, ५ जणांवर उपचार सुरू
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रपारा जिल्ह्यातील पट्टामुंडाई ब्लॉकमधील कुपुनी गावातील एका कुटुंबासोबत ही घटना घडली. गुरुवारी रात्री त्यांनी कलिंगडाचे सेवन केले आणि दुसऱ्या दिवशी सकाळ होताच सर्वांना आरोग्याच्या समस्या जाणवू लागल्या. यामुळे त्यांच्या पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या, त्यांनी उल्टी होऊ लागली आणि मग थोड्या वेळानेच त्यांना जुलाब होऊ लागले. पाहता पाहताच कुटुंबातील ६ लोक आजारी पडले. त्यांची अवस्था इतकी बिघडली की त्यांना केंद्रपाड्यातील मुख्य रुग्णालयात दाखल करावे लागले. यातील दोघांची प्रकृती अधिक बिकट झाल्याने त्यांना कटकला पाठवण्यात आले.
दरम्यान उपचारावेळी कुटुंबातील लहान मुलगा स्वाधीन सेनापति मरण पावला. त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबात शोककळा पसरली आणि दु:खाचे वातावरण निर्माण झाले. एका कलिंगडामुळे इतकं सर्व होऊ शकतं याचा त्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता.
केंद्रपाडा जिल्हा रुग्णालयातील डाॅक्टर अंबिका प्रसाद यांनी सांगतले की, कुटुंबातील सदस्यांना उलट्या, जुलाब आणि पोटदुखीचा त्रास होत होता. प्राथमिक तपासणीत हे अन्न विषबाधेचे प्रकरण असल्याचे निष्पन्न झाले आहे. कुटुंबातील अन्य सदस्यांवर उपचार सुरु असून बाकी सर्वांची स्थिती आता स्थिर होत असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर आरोग्य विभागा सतर्क झाला असून कलिंगडात नक्की असे काय होते आणि खरंच विषबाधेमुळे मृत्यू झाला आहे का याचा शोध घेतला जात आहे.
पाटणात रिक्षाचालकाची निर्घृण हत्या; शवाचे 3 तुकडे करुन रेल्वे ट्रॅकवर फेकले, शीर अजूनही बेपत्ता
दरम्यान देशाच्या अनेक भागांतून अशा घटना मागील काही काळापासून समोर आल्या आहेत. यात महाराष्ट्रातील मुंबई, मध्य प्रदेशातील श्योपूर आणि छत्तीसगडमधील घुरकोट शहरांचा समावेश आहे. या सलग घटनांमुळे आता अन्नसुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.