
ताम्हिणी घाटात भीषण अपघात
दगड डोक्यात पडल्याने महिलेचा मृत्यू
रायगड जिल्ह्यातील घटना
Raigad Tamhini Ghat Accident: रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात भीषण अपघात घडला आहे. या अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे. ताम्हिणी घाटातून जाणाऱ्या एका कारवर दरड कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे. नेमका हा अपघात कसा घडला आहे, त्याबाबत जाणून घेऊयात.
रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात भीषण अपघात घडला आहे. चालत्या कारवर दगड पडून महिलेचा मृत्यू झाला आहे. घाटातून एका कार जात असताना डोंगरावरून एक दगड खाली घसरत आला. हा दगड थेट कारवर जाऊन कोसळला. या दगडाचा वेग इतका होता की हा दगड कारचे सनरूफ तोडून गाडीत असलेल्या महिलेच्या डोक्यात पडला या अपघातामध्ये महिलेचा मृत्यू झाला आहे.
ताम्हिणी घाटातून प्रवास करणारी गाडी पुणे मार्गे कोकणात जात सल्याचे समजते आहे. दरम्यान महिलेच्या डोक्यात दगड लागताच त्यांना उपचारांसाठी रूग्णालयात नेले गेले. मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केल जात आहे.
साई भक्तांवर काळाचा घाला
नाशिकच्या येवल्यातून एक अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. सुरतेहून शिर्डीकडे निघालेल्या साई भक्तांवर काळाने घाला घातला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने फॉर्च्युनर गाडीचा भीषण अपघात घडला आहे. यात गाडीने चक्क तीन पलट्या घेतल्या असून या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर चार जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना नाशिकच्या येवला तालुक्यातील एरंडगाव – रायते शिवारात हि दुर्दैवी घटना घडली आहे.
Nashik: साई भक्तांवर काळाचा घाला! फॉर्च्युनर तीनदा पलटी, भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडीने तीन पलट्या घेतला आहे. अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी झाल्याची माहिती आहे. सध्या जखमींना नाशिक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. या दुर्दैवी अपघाताची येवला पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. साई भक्तांवर काळाने घाला घातला असून त्या अपघातात तीन साई भक्तांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.