Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Election : ‘आधी महाराष्ट्र, आता दिल्लीनंतर युपी, बिहार’; पत्रकार परिषदेत संजय राऊत यांचा खळबळजनक दावा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर इव्हीएम आणि अचानक वाढलेल्या मतांची आकडेवारीवरून गेले दोन महिने विरोधकांकडून आरोप करण्यात येत आहेत. उद्या ८ फ्रेब्रुवारी रोजी दिल्ली निवडणुकांचा निकाल लागणार आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Feb 07, 2025 | 05:27 PM
'आधी महाराष्ट्र, आता दिल्लीनंतर युपी, बिहार'; पत्रकार परिषदेत संजय राऊत यांचा खळबळजनक दावा

'आधी महाराष्ट्र, आता दिल्लीनंतर युपी, बिहार'; पत्रकार परिषदेत संजय राऊत यांचा खळबळजनक दावा

Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर इव्हीएम आणि अचानक वाढलेल्या मतांची आकडेवारीवरून गेले दोन महिने विरोधकांकडून आरोप करण्यात येत आहेत. उद्या ८ फ्रेब्रुवारी रोजी दिल्ली निवडणुकांचा निकाल लागणार आहे. मात्र एक्झिट पोलचे सर्वच्या सर्व कल भाजपच्या बाजूने गेले आहेत. त्यामुळे अरविंद केजरीवा आणि कॉंग्रेसचं टेन्शन वाढलं आहे. दरम्यान दिल्ली निवडणूक निकालाआधी राहुल गांधी, संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांनी एकत्र परिषद घेत वाढलेल्या मतदानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. संजय राऊत यांनी तर खळबळजनक दावा केला आहे.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीनंतर अचानक मतदारांची संख्या वाढली. दिल्लीतही तोच प्रकार झाला. येत्या काळात बिहारच्या निवडणुका होणार आहेत. त्यानंतर देशातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाचं राज्य उत्तर प्रदेशमध्येही निवडणुका होणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्र आणि दिल्लीत वापरेली हिच पद्धत त्या निवडणुकांमध्ये वापरली जाईल, अशी शंका त्यांनी उपस्थित केली आहे.

निवडणूक आयोग मरणासन्न अवस्थेत आहे. भाजपने त्यांच्यावर ही वेळ आणली आहे. जर निवडणूक आयोग निष्पक्ष असेल तर त्याने राहुल गांधी यांनी आणि विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्वांची उत्तर द्यावीत. आरोप नाही पण विरोधक जर काही प्रश्न उपस्थित करत असतील तर त्याला निवडणूक आयोगाला उत्तर देऊन त्यांचं समाधान करावं लागेल, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रात इतके मतदार अचानक कुठून आले: राहुल गांधी

राहुल गांधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार नेत्या सुप्रिया सुळे आणि शिवसेना (यूबीटी) यांच्यासोबत दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राहूल गांधी  म्हणाले, ‘पाच वर्षात म्हणजेच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूक  2019 ते लोकसभा निवडणूक 2024 या काळात 32 लाख नवे मतदार मतदार यादीत जोडले गेले. तथापि फक्त पाच महिन्यात म्हणजे लोकसभा निवडणूक 2024 ते विधानसभा निवडणूक 2024 या काळात 39 लाख मतदार मतदार यादीत जोडले गेले. मग प्रश्न आहे, की महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीनंतर 39 लाख मतदार यादीत जोडले गेले आहेत.  हे 39 लाख मतदार कोणते आहेत.एकट्या  हिमाचल प्रदेशचे जेवढे मतदार आहेत तेवढे मतदार महाराष्ट्राच्या यादीत या पाच महिन्यात कसे जोडले गेले. असा सवाल राहूल गांधी यांनी उपस्थित केला. तसेच, केवळ पाच महिन्यात 39  लाख मतदार कसे आणि कुठून  जोडले गेले याचे उत्तर निवडणूक आयोगाने दिले पाहिजे, अशी मागणी लोकसभेचे खासदार आणि विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत  होते.

Web Title: Delhi election 2025 sanjay raut serious allegations on election commission eci suddenly increase voting list in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2025 | 03:43 PM

Topics:  

  • Delhi Assembly election 2025
  • Delhi Election
  • Delhi Election 2025
  • sanjay raut

संबंधित बातम्या

टिपू सुलतान हा पाकिस्तानचा नायक तर क्रिकेटचा सामना कशाला? खासदार संजय राऊतांची मॅचवरुन राजकीय टीका  
1

टिपू सुलतान हा पाकिस्तानचा नायक तर क्रिकेटचा सामना कशाला? खासदार संजय राऊतांची मॅचवरुन राजकीय टीका  

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सापडले वादात; संजय राऊत यांनी व्हिडिओ केला ट्विट
2

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सापडले वादात; संजय राऊत यांनी व्हिडिओ केला ट्विट

Sanjay Raut News: ‘तुम्ही सांगताय की मी सांगू?’;  राहुल नार्वेकरांचा व्हिडिओ शेअर करत संजय राऊतांचा खोचक सवाल
3

Sanjay Raut News: ‘तुम्ही सांगताय की मी सांगू?’; राहुल नार्वेकरांचा व्हिडिओ शेअर करत संजय राऊतांचा खोचक सवाल

Sanjay Raut News: प्रफुल पटेल म्हणजे शाहांचे ‘रिमोट कंट्रोल’!  संजय राऊतांचा गंभीर आरोप
4

Sanjay Raut News: प्रफुल पटेल म्हणजे शाहांचे ‘रिमोट कंट्रोल’! संजय राऊतांचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.