Bakaiti Season 2: 'बकैती सीजन 2' टेलर प्रदर्शित(फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
सध्या OTT वर एकाच टाईपच्या क्राईम आणि थ्रिलर वेबसिरीज पाहून कंटाळा आला असेल तर तुमच्यासाठी एक भारी बातमी आहे. सगळ्यांची लाडकी कटारिया फॅमिली पुन्हा येत आहे. ZEE5 ने आपल्या सुपरहिट शो ‘बकैती सीजन 2’ चा ट्रेलर रिलीज केला असून ट्रेलर पाहूनच हसून हसून पोट दुखायला लागलंय. हा नवा सीजन 25 सप्टेंबर 2026 पासून हिंदी ZEE5 वर पाहायला मिळेल. Bakaiti Season 2
पहिला सीजन प्रेक्षकांना एवढा का आवडला? कारण त्यात आपल्या घरचीच गोष्ट होती. मध्यमवर्गीय कुटुंब, रोजचे वाद, आईचा ओरडा, बाबांचं टेन्शन, भावंडांची भांडणं हे सगळं प्रत्येकाच्या घरात घडतं. त्यामुळे लोकांना कटारिया फॅमिली आपलीच वाटली होती. त्याच यशानंतर आता मेकर्स दुसरा सीजन घेऊन आले आहेत आणि यावेळी धमाका डबल आहे.
ट्रेलरवरून गोष्ट थोडी समजते. पहिल्या सीजननंतर जवळपास एक वर्ष झालं आहे. आता एका अनपेक्षित घटनेमुळे अजय, अल्का आणि अमन परत कटारिया कुटीरमध्ये राहायला येतात. म्हणजे आता दोन्ही कटारिया फॅमिली एकाच घरात राहणार. जिथे दोन फॅमिली एकत्र येतात तिथे गोंधळ होणारच. सुरुवातीला ही तात्पुरती व्यवस्था वाटते, पण नंतर त्याचा मोठा वाद होतो. वेगवेगळी मतं, दुखावलेला इगो, जुन्या भांडणांचा हिशोब आणि रोजचे किचकिच. घरात सतत बकैती सुरू असते.
पण या हसण्या खेळण्यामागे एक इमोशनल गोष्ट सुद्धा आहे. कुटुंबावर पैशाचा दबाव आहे, नात्यांमध्ये प्रॉब्लेम आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नानाजींची तब्येत ठीक नाही, त्यांची स्मरणशक्ती कमी होत चालली आहे. अशातच कटारिया कुटीर विकून तिथे नवीन बिल्डिंग बांधण्याचा विषय येतो. आता हे घर फक्त घर राहत नाही, तर इमोशन बनतं. घर म्हणजे नक्की काय? हाच प्रश्न सगळ्यांना पडतो. या सगळ्या गोंधळात भरडला जातो तो संजय कटारिया. त्याला एका संकटातून दुसऱ्या संकटातून वाट काढावी लागते.
या सीजनमध्ये पण जुनीच टीम आहे. डाईस मीडिया ने हा शो बनवला आहे आणि समर इक्बाल यांनी दिग्दर्शन केलं आहे. राजेश तैलंग, शीबा चड्ढा, तान्या शर्मा आणि आदित्य शुक्ला हे मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्यासोबत देविशी मदान, रित्विक नाम्बियार आणि अशोक चव्हाण पण दिसणार आहेत.
मेकर्सचं म्हणणं आहे की यावेळी बकैती डबल आहे. कारण फॅमिली पण डबल झाली आहे. एकाच छताखाली दोन कुटुंब, त्यामुळे डबल वाद इमोशन सुद्धा पाहायला मिळणार आहे. हा शो फक्त विनोद नाही तर आपल्या रोजच्या आयुष्यातल्या गोष्टींवर आहे. पैसा, भावंडांचं नातं, आई वडिलांचं टेन्शन, पिढ्यांमधला फरक या सगळ्यावर हा शो बोलतो.
दिग्दर्शक समर इक्बाल म्हणाले की, “बकैती हे माझ्या खूप जवळचं जग आहे. जिथे कोणी डायरेक्ट I Love You म्हणत नाही, पण जेवण झालं का? हे नक्की विचारतात. हाच गोंधळ आणि आपुलकी कटारिया फॅमिलीला खास बनवते. सीजन 2 मध्ये आम्ही पात्रांच्या इमोशनवर जास्त काम केलं आहे.”
राजेश तैलंग आणि शीबा चड्ढा यांनी पण सांगितलं की या शो मध्ये परत येऊन खूप छान वाटतंय. प्रेक्षकांनी पहिल्या सीजनला एवढं प्रेम दिलं, त्यामुळे दुसऱ्या सीजनची जबाबदारी वाढली आहे.जर तुम्हाला फॅमिली ड्रामा, कॉमेडी आणि इमोशनल शो आवडत असेल तर ‘बकैती सीजन 2’ तुमच्यासाठीच आहे. 25 सप्टेंबरला ZEE5 वर पाहायला विसरू नका. कटारिया कुटीरमध्ये पुन्हा एकदा गोंधळ सुरू होणार आहे.






